आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या ग्रंथी असतात. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी आहे. तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे. जेव्हा थायरॉईड ग्रंथी आवश्यक प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करते. त्याला हायपोथायरॉईडीझम म्हणतात आणि जेव्हा थायरॉईड ग्रंथी खूप जास्त हार्मोन्स तयार करते.
त्याला हायपरथायरॉईडीझम असे म्हणतात. अचानक वजन वाढणे, केस गळणे, थकवा, अपचन, नैराश्याने ग्रस्त या समस्या थायरॉइडच्या विकारांमुळे उद्भवलेली असू शकतात. थायरॉईड चे सर्वात सामान्य कारण म्हणजे ग्रेव्ह्स रोग. हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामध्ये स्वयं-प्रतिपिंडे थायरॉईड ग्रंथीला जास्त प्रमाणात थायरॉईड संप्रेरक निर्माण करण्यासाठी उत्तेजित करतात. स्त्रियांमध्ये हे अधिक वारंवार होत आहे.
थायरॉईड ग्रंथीवर गुठळ्या तयार झाल्यामुळे, हार्मोन्सचा जास्त स्त्राव होऊ शकतो. शरीरात आयोडीनची जास्त कमतरता असल्यामुळे थायरॉईडची समस्या उद्भवते. गर्भधारणेदरम्यान, स्त्रीच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. यातील काही हार्मोन्समधील बदलामुळे हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो. याव्यतिरिक्त, जेव्हा पिट्यूटरी ग्रंथीमध्ये कर्करोगाच्या पेशी विकसित होतात तेव्हा थायरॉईड संप्रेरक उत्पादन वाढतात.
आज आपण यावरचे तीन उपाय बघणार आहोत. पहिल्या उपायमध्ये आपल्याला लागणार आहे अळशीच्या बिया. या बिया थोड्या भाजून घ्याव्या आणि त्याची पूड बनवावी. ही पूड सकाळी काहीही न खाता पिता ही पूड एक चमचा एक ग्लास पाण्यासोबत घ्यावी. हे सेवन करताना तुम्ही या बियांची पूड पाण्यात एकत्र करून सुद्धा घेऊ शकता किंवा आधी एक चमचा पूड खाऊन त्यावर पाणी सुद्धा पिऊ शकता. या बीयांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड चे प्रमाण जास्त असते.
दुसरा उपाय म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीरची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत आणि त्याची पेस्ट बनवावी. हि पेस्ट एक ग्लास पाण्यात टाकून ते पाणी सकाळी निराळ्या पोटी सेवन करावे. यामध्ये प्रोटीन, वसा, कार्बोहायड्रेट, फायबर आणि बऱ्याच प्रकारचे मिनरल्स असतात. याशिवाय कोथिंबीरमध्ये कॅल्शियम, आयर्न, थियामीन, पोटॅशियम, विटामिन सी, फॉस्फरस आणि कॅरोटीनदेखील असतं.
जर तुमच्या थायरॉईडच्या गोळ्या चालू असतील तर या गोळ्या घेतल्यानंतर एका तासाने तुम्ही हा रस घेऊ शकता. तिसरा उपाय अगदी सरळ आणि सोपा आहे. यासाठी लागणार आहे एक ग्लास कोमट पाणी आणि यात टाकायचे आहे एक चमचा लिंबूचा रस आणि एक चमचा आल्याचा रस. हे एकत्र करून एक ग्लास प्यायचे आहे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकले जातात. पचन सुधारते. थायरॉईड सुद्धा हळू हळू कमी होण्यास मदत होते.
हे उपाय करताना तुम्हाला सलग पाच दिवस करायचा आहे मग पुन्हा दोन दिवस आराम करून हा उपाय सुरु करायचा आहे. असे तुम्हाला 20 ते 25 दिवस घ्यायचे आहे. पण एक लक्षात ठेवा हे उपाय करताना तुम्ही एकाच वेळी केला पाहिजे. नेहमी वेळा बदलू नका. तुम्हाला लगेच चांगला परिणाम जाणवेल. मग नक्की करून पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.