पोटाची वाढलेली चरबी करा गायब.! फक्त करा एवढे एक काम.! वाढत चाललेल्या चरबीचा मिळेल ब्रेक.!

आरोग्य

सतत बसून काम केल्याने, बाहेरचे अन्नपदार्थ खाल्याने आपल्या पोटाची, मांड्यांची चरबी वाढलेली दिसते. कितीही उपाय केले तरीही चरबी कमी होत नाही. म्हणूनच आज आपण एक सोपा आणि गुणकारी उपाय बघणार आहोत. बडीशेप आपल्या पचन तसेच मेंदूसाठी खूप फायदेशीर असते. बडीशेप चघळत असताना, त्याची चव आपल्या जीभेवर पूर्ण समाधान करते तर त्याचा सुगंध आपले मन शांत करते.

बडीशेप खाल्ल्याने केवळ शरीर आणि मन शांत होत नाही तर रोग प्रतिकारशक्तीही वाढते. कारण व्हिटॅमिन-सी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक पेशी वाढविण्याचे कार्य करते. व्हिटॅमिन-सी शरीरातील पांढर्‍या रक्त पेशी म्हणजे डब्ल्यूबीसी संख्या वाढविण्यास मदत करते. बडीशेप आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. कारण हे व्हिटॅमिन-सी मिळवण्याचे नैसर्गिक साधन आहे.
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने आपली शारीरिक दुर्बलताही दूर होते.

कारण बडीशेप मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज इत्यादी पौष्टिक घटक असतात. हे सर्व खनिजे आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करतात. खोकल्यावर बडीशेप मधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकल्यात फरक जाणवेल.
म्हणूनच या उपायासाठी आपल्याला लागणार आहे बडीशेप 2 चमचे, जीरा 1 चमचा आणि धणे 1 चमचा.
हे तीनही एकत्र करून 1 ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे.

हे वाचा:   घरामध्ये चुकीच्या दिशेमुळे झाला आहे वास्तुदोष, तर मग करा एवढे एक काम, सर्व वास्तू दोष निघून जाईल.!

जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमीन्स आढळतात. जे त्वचेच्या व्हिटॅमीन ई च्या गरजेला पूर्ण करतात. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अँटी ऑक्सीडंट पचनक्षमता वाढवतात. जिरं आपल्या प्रतिकारशक्तीलाही वाढवतं. त्यामुळे पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. जिऱ्याच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगलं पचत.

जिऱ्याचं सेवन केल्यास तुमच्या कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते. तसेच धणे सुद्धा शरीरासाठी थंड असतात. धणे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. धन्यामध्ये असे गुणधर्म आहेत, जे तुमची पचनसंस्था निरोगी बनवते. तसेच पचनाशी संबंधित अनेक आजार बरे करण्यास मदत करते. सकाळी त्याचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते.

हे वाचा:   याचा फक्त एक चमचा ७ दिवस घ्या; हाडांसंबंधी एकही समस्या राहणार नाही, शरीर होईल दगडासारखं मजबूत.!

हे चयापचय वाढवते. यामुळेच वजन कमी होण्यास मदत होते. म्हणूनच हे मिश्रित पाणी सकाळी निराळ्या पोटी सेवन केले तर शरीरातील जास्त असलेली चरबी कमी व्हायला लागेल. ज्यांना सकाळी हे पाहिजे सेवन करायचे नसेल त्यांनी रात्री हे प्यावे. शक्यतो हा उपाय सलग सात आठ दिवस करावा. ज्यांना जमत नसेल त्यांनी आठवड्यातून दोनदा तरी हा उपाय करून पाहावा. तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *