पायाला खूप सूज येते का.? यामागे काय कारण आहे तेच समजेना.? खूपच थकवा आल्यासारखे वाटत आहे का.? अशा वेळी साखरेत टाकायचा हा एक पदार्थ.!

आरोग्य

मित्रांनो माणसाला आता आपल्या कामातून अजिबात वेळ मिळत नाही. सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व नियोजन अगदी फिक्स असते. लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत सर्वांना आता एक जीवनाचे वेळा पत्रक फोल्लो करावे लागते. मात्र या सर्वात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या शरीराला किती आराम हवा आणि याच्या कडून किती काम करुन घेतले पाहिजे याचा विचार आपण करतच नाही.

फक्त सकाळ संध्याकाळ आपली मेहनत चालू असते. एकाच जागी उभे राहून अथवा खूप वेल चालल्याने आपल्या पायाला वारंवार सूज येत राहते. आज काल आपल्या आजू बाजूच्या परिसरात अनेक लोक या समस्येने ग्रस्त झाले आहेत. आधी ही समस्या फक्त वृध्दांना होत असे. मात्र आता प्रत्येक वयोगटातील माणसांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पायाला सूज येणे, शरीरात अशक्तपणा जाणवत राहणे व जरासे काम केले की थकवा येणे.

या सर्व समस्यांसाठी आपण बाजारात मिळणार्या गोळ्या व औषधे घेतो. मात्र या अनैसर्गिक गोळ्या व औषधे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणावर हानिकारक ठरू शकतात. यांचे नियमित सेवन केल्यास आपल्या आंतर इंद्रियांची झिज होतो. या गोळ्या व औषधे तुम्हाला काही काळ आराम देतात. म्हणूनच शक्यतो या गोळ्यांचा वापर शक्यतो टाळावा. तुम्ही देखील या समस्येने त्रस्त आहत का व यावर एक रामबाण व कायमचा उपाय शोधत आहत का..?

हे वाचा:   मासे न खाणारे लोक.! आजच सावध व्हा.! आयुष्यातले पाच वर्ष होतील कमी.!

तर आता चिंता करणे सोडा व सुटकेचा निश्वास घ्या. हा लेख अगदी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी असा एक घरगुती व नैसर्गिक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. जो फक्त दोन ते तीन दिवस केल्यास तुम्हाला या समस्येतून मुक्तता मिळू शकते. हा एक आयुर्वेदीक उपाय आहे त्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम झालेला दिसून येत नाही.

सोबतच जसे आम्ही म्हणालो हा एक घरगुती उपचार आहे. हा तुम्ही अगदी सहजरीत्या तयार करु शकता. स्वयंपाक घरातील काही सामग्रीचा वापर करुन तुम्ही हा उपाय घरच्या घरीच तयार करु शकता. अगदी सामान्य लोकांच्या खिशाला देखील परवडेल असा हा उपाय आहे. चला तर आता वेळ न घालवता पाहूया नक्की काय आहे हा उपाय. आपल्या भारतीय घरात जीरे जेवणात आवर्जुन वापरले जाते.

हे वाचा:   काही दिवस डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीरात झाले असे काही बदल.! अनेकांना हे अजिबात माहिती नाही.! प्रत्येकाने जाणून घ्या.!

जीरे फक्त मसाल्यात वापरण्याचा घटक नाही तर याचे काही औषधी गुणधर्म देखील आहेत. जीर्याचे सेवन केल्यास शरीराची पचन संस्था सुरळीत कार्यरत होवू लागते. शरिरातील मेटो बोलिसम देखील वाढते. यात शरीर उपयुक्त अनेक घटक आपल्याला मिळतात. हा आहे आपला पहिला घटक. या उपायासाठी आपला दुसरा घटक आहे साखर. साखर आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनली आहे.

साखर आपल्या शरीराला ग्लुकोज मोठ्या प्रमाणावर देते. शरिरातील थकवा व अशक्तपणा काढून टाकण्यासाठी साखर खूप उपयुक्त मानली जाते. जीरे व साखर यांना मिक्सर मध्ये बारीक करुन यांची पेस्ट तयार करा. आता रोज रात्री झोपण्याच्या आधी दूधात दोन ते तीन चमचे हे मिश्रण टाकून याचे सेवन करा. याच्या चार ते पाच दिवस नियमित सेवनाने नैसर्गिक रित्या तुम्हाला येणारी पायाची सूज व अशक्तपणा नष्ट होवून जाईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.