अंगदुखी वर आहे रामबाण उपाय; कोणत्याही प्रकारचा आजार असू द्या होईल एकदम बरा, एकदा नक्की करून बघा.!

आरोग्य

आपल्या स्वयंपाक घरांमध्ये असे अनेक मसाल्याचे पदार्थ असतात त्यांचे औषधी गुणधर्म देखील अनेक आजारांवर  उपायकारक असतात. आपली आई आपल्याला बरेचदा काही आजार किंवा दुखणे झाल्यास घरातील या मसाल्याचे पदार्थ वापरून आपल्याला झटदिशी दुखण्यातून बरे करत असते.

स्वयंपाक घरामध्ये मसाल्याच्या पदार्थातील मुख्य पदार्थ म्हणजे काळी मिरी होय. काळी मिरी खाण्याचे अनेक फायदे असतात. अनेक पदार्थांमध्ये आज-काल काळी मिरीची पूड पेरली जाते. त्यामुळे पदार्थांना स्वादही येतो आणि चव ही वाढते.

काळीमिरीमध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न व थायमिन असते. जे आरोग्यकरता अतिशय महत्त्वपूर्ण असतात. रोज सकाळी उपाशीपोटी काळीमिरी सेवन केल्यामुळे आपल्याला अनेक आजारांमध्ये लाभ मिळतो. काळीमिरीच्या सेवनामुळे एका आठवड्याच्या आत अनेक आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते, तसेच अनेक आजारांचे मुळापासून उच्चाटन होते.

काळी मिरी खाण्याचे फायदे- काळी मिरीच्या सेवनामुळे मलेरिया या आजारापासून सुटका होते. काळी मिरीमधील अँटीव्हायरस व अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे मलेरिया बरा होतो व व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते.

डोळ्यांची दृष्टी कमी झाली असल्यास रोज सकाळी उपाशीपोटी काळीमिरीचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारते व चष्मा देखील उतरतो. ताज्या लोण्यामध्ये चार ते पाच काळीमिरी टाकून रोज सकाळी उपाशीपोटी सेवन केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

हे वाचा:   माशाचे सेवन करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचावे...! मासे आणि हा पदार्थ चुकूनही खाऊ नका...!

दातदुखी असेल किंवा अंग दुखत असेल किंवा त्या जागेवर सूज आली असेल तर काळीमिरी कुटुन त्या जागी लेप लावावा. काळीमिरीचा लेप लावाल्यामुळे दुखणे व सूज देखील लवकर उतरते.

हाय बीपीचा त्रास असेल,तर त्या व्यक्तीने आपले ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी पाच काळीमिरी कुटुन त्याची पावडर बनवावी व अर्धा ग्लास पाण्यासोबत नियमित सेवन करावे.

खोकल्याचा त्रास अनेक लोकांना असतो, बरेच वेळा खोकल्याची उबळ आल्यावर अक्षरश: डोळ्यातून पाणी येते अशा वेळी आपल्याला खोकल्यावर आराम मिळण्याकरता आपण बरीच औषधे सेवन करतो. मात्र यावर काळीमिरीचा खूप प्रभावी उपाय उपलब्ध आहे. आपल्याला जर जास्त खोकला होत असेल तर काळीमिरी बारीक कुटून घ्यावी व एक चमचा मधामध्ये मिसळून हे चाटण घ्यावे. यामुळे खोकल्यामध्ये लगेच आराम मिळतो.

बरेचसे पालक लहान मुलांना अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही म्हणून चिंतेत असतात. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स घेतात. मात्र आपल्या घरांमधील काळीमिरी स्मरणशक्ती वाढविण्याकरता अतिशय प्रभावी आहे.

हे वाचा:   उपवास करणे म्हणजे दिवसभर उपाशी राहणे असे नसते; उपवास कसा करावा हे ९९% लोकांना माहिती नसेल.!

तसेच म्हातारपणामुळे देखील अनेक लोकांना विस्मरणाची समस्या होते, अशावेळी एक चमचा तुपामध्ये आठ काळीमिरी आणि साखर मिक्स करून रोज सकाळी उपाशीपोटी याचे चाटण घेतल्यास स्मरणशक्ती मध्ये सुधारणा होते. तसेच जर मेंदू संबंधी काही तक्रारी असतील तर मेंदूची कमजोरी देखील दूर होते.

बऱ्याच लोकांना गॅसेसची समस्या असते, ज्यामुळे व्यक्तींना पोट फुगल्यासारखे होते व गॅसेसच्या समस्येमुळे छातीत व पोटात चमका निघतात व अस्वस्थ वाटते. गॅसेसची समस्या असेल तर लिंबाच्या रसाबरोबर काळीमिरी कुटुन खावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *