अनेक लोकांना या वनस्पती मुळे दा’रू सोडली आहे.! जिथे सापडेल तिथून घेऊन या.! लाखो रुपये खर्च करूनही मिळणार नाही अशी सोन्यासारखी वनस्पती.!

आरोग्य

आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या वनस्पती असतात. आज आम्ही पुन्हा एकदा एक अनोखी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आजचा माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण आज ज्या बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती वनस्पती न’शा सोडवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. कितीही जुना, कोणत्याही प्रकारचा न’शा असला तरीही या वनस्पतीच्या प्रयोगाने ती न’शा सुटेल.

आपण ज्या वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत त्याचं नाव आहे चांगेरी.(Indian Sorrel) तीन पान असलेलं त्रिपत्री गवत अशी याची ओळख आहे. कदाचित तुम्ही याला खट्टीमिठ्ठी गवत असेही ओळखत असाल. घराच्या आसपास रिकाम्या जागेत हे खूप मोठ्या प्रमाणावर सहज आढळते. बऱ्याच घरामध्ये या वनस्पतीच्या पानांची भाजी बनवून खाल्ली जाते.

ही रानभाजी तुरट आंबट चवीची अत्यन्त गुणकारी असते. या वनस्पतीवर पिवळी फुले येतात. या वनस्पतीचे अत्यंत चमत्कारिक फायदे असल्याने आयुर्वेदात अनेक औषधी बनवण्यासाठी यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सतत डोकेदुखी होत असेल तर याच्या पानांचा रस माथ्यावर लावल्याने भयंकर डोकेदुखी मिटेल. खोकला येणे कफ होणे यांसारखी समस्या असेल तर याच्या पानांचा रस बनवून दोन दोन थेंब पाणी मिसळून नाक पुड्यामध्ये टाकल्याने लवकर आराम मिळतो.

हे वाचा:   आता डोक्यावर एकही पांढरा केस दिसणार नाही, हा उपाय करेल पांढऱ्या केसांची सुट्टी.!

याशिवाय, लहान मुलांना भूक न लागणे, पचनशक्ती कमजोर झाली असेल तर चांगेरी च्या पानांसोबत पुदिना आणि आल्याची चटणी बनवून खावी. आंबट चव असल्याने चटणी खूप स्वादिष्ट बनते. असं केल्याने लहान मुलांची भूक वाढेल. पचनशक्ती सुधारेल. जर तुम्हाला मुळव्याधीची गंभीर समस्या भेडसावत असेल तर तुम्ही या रानभाजी ची ताज्या पानांची भाजी बनवून खावी. असं केल्याने तुम्हाला मुळव्याधीत लाभ होतो.

सोबतच, ही जी चांगेरी जडीबुटी आहे ती नशा सोडवण्यासाठी सर्वोत्तम पैकी एक आहे. भांग,अफिन किंवा दारू अथवा कोणत्याही प्रकारचा नशा असू देत ते सोडवण्यासाठी ही वनस्पती अत्यंत फायदेशीर आहे. या वनस्पतीच्या ताज्या पानांचा रस रुग्णाला रोज पाजल्याने हळूहळू नशेची सवय तुटते आणि नशा करण्याची तल्लफ होत नाही.आणि रुग्ण हळूहळू नशेबाहेर पडतो.

हे वाचा:   म्हातारे सुध्दा तरुण पोरांसारखे पळू लागतील.! गुडघ्याच्या वाट्या टणक बनल्या जातील.! गुडघ्याच्या दवाखान्यात जायच्या आधी वाचा.!

परंतु याचा प्रयोग तुम्ही जाणकार वैद्याच्या सल्ल्यानुसारच करावा. या वनस्पतींच्या पानांचा रस चंदन पावडर मिक्स करून १५ मिनिटे फेसपॅक प्रमाणे चेहऱ्यावर लावल्याने मुरमं डाग यांची समस्या संपते. महिलांमध्ये असणारी श्वेतपदर ची समस्याआणि त्यामुळे होणारी हाडं दुखी ही या वनस्पतीच्या पानाच्या रसाच्या रोजच्या सेवनाने कमी होते. खात्री आहे आम्ही दिलेला या वनस्पतींच्या माहितीचा तुम्हाला नक्की फायदा होईल..!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.