ह्या पाच जडीबुटी घ्या, कुठल्याच गोष्टीचा टेन्शन येणार नाही, विसरभोळेपणा पासून मिळेल कायमची सुटका, मेंदू होईल दहापट फास्ट.!

आरोग्य

आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये दररोज अनेक गोष्टी घडत असतात. अनेकदा आपल्याला काही गोष्टी आठवत नाही तर काही गोष्टी ह्या आपल्या लक्षात राहत नाही. विसरभोळेपणा हा सर्वांनाच जाणवत असतो खास करून वृद्ध नागरिकांना ही समस्या जास्त प्रमाणात होत असते. आपले जीवन हे सुख- दुःखाने सामावलेले आहे. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत असतात परंतु काही गोष्टी या मनाविरुद्ध होत असतात.

जेव्हा काही गोष्टी ह्या मनाविरुद्ध होतात तेव्हा आपल्याला मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असते. मानसिक तणावामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. त्यामुळे आपल्याला अनेक शारीरिक नुकसान होण्याची देखील शक्यता असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला मानसिक त्रास कमी करण्याचा तसेच विसरभोळेपणा कमी करण्याच्या काही गोष्‍टींविषयी माहिती सांगणार आहोत. अशा काही गोष्टी यांचे सेवन नियमित स्वरूपात करायला हवे.

दालचिनी:- तसे तर हे सर्वांना माहिती आहे की दालचिनी ही किचनमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते. खासकरून मसाल्याच्या पदार्थांमधील दालचिनी वापरली जात असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का कि हि एक लाभदायक जडीबुटी आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी दालचिनी पावडर मधामध्ये एकत्र करून खाल्ल्यास यामुळे मानसिक तणाव कमी होत असतो. यामुळे तुमचा विसरभोळेपणा देखील कायमचा नष्ट होईल.

हे वाचा:   चेहऱ्यावर लिंबू लावताय, सावधान...! लिंबू चेहऱ्याचे बनवू शकते असे हाल.!

हळद:- हळद हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्या घरांमध्ये आढळला जातो हळदीचे अनेक गुणधर्म असतात. यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक मानले जातात. याच्या उपयोगामुळे आपले अनेक आजार नाहीसे होत असतात. याचा उपयोग आपण कॅन्सरच्या आजारावर देखील करू शकतो. यामध्ये कुरकुमीन नावाचे तत्व असते जे माणसाच्या मेंदूसाठी खूपच उपयुक्त मानले जाते.

शंखपुष्पी:- शंखपुष्पी मुळे आपला मेंदू हा अतिशय तल्लख होत असतो. शंखपुष्पी चे सेवन केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचा शारीरिक फायदा होत असतो. अनेक लोक याचे सेवन करत असतात. शंखपुष्पी चे सेवन नियमित स्वरूपात करायला हवे. शंखपुष्पी चे सेवन गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा टाकून करायला हवे. यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह चांगला होत असतो. यामुळे मेंदूची क्षमता देखील वाढत असते.

हे वाचा:   हे एक पान कितीही मोठी मस, काळे डाग, वांग गायब करून टाकते, असा करा हा भंन्नाट उपाय.!

तुळशी:- तसे पाहिले गेले तर तुळस ही खूपच मोठी औषधी वनस्पती आहे. तुळशीचे अनेक फायदे शरीरासाठी होत असतात. तुळस ही खूपच मोठी अँटिबायोटिक वनस्पती आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट तत्व मस्तिष्कला आणि हृदयाला खूपच फायदेशीर ठरत असते. यामुळे मेंदूचा व हृदयाचा रक्तप्रवाह खूपच चांगल्या पद्धतीने होत असतो.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *