आजचा आपल्या घरगुती उपायामुळे तुमच्या घरातील मच्छर पाच मिनिटांमध्ये घरातून पळून जातील. या उपायामुळे मच्छर,माश्या घरातून पळून जातीलच पण त्याच बरोबर घरामध्ये एक सुगंध देखील दरवळेल. आपल्या सर्वांनाच माहीत असेल की मच्छर घरामध्ये असल्यामुळे मच्छर रोज आपल्याला चावल्यामुळे म’ले’रि’या, डें’ग्यू सारखे भयानक आजार आपल्याला होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला या पासून सावध राहायचे आहे.
त्यामुळे आज आपण असा उपाय जाणून घेणार आहोत जो पूर्णतः आयुर्वेदिक आहे. हा उपाय केल्याने आपल्या शरीरावर कोणतेच साईड इफेक्ट होणार नाही किंवा त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आह त्याबद्दल. सर्वप्रथम आपल्याला इथे लागणार आहेत दालचिनीची पाने.
आपल्याला सर्वांना माहीतच असेल की दालचिनीची पाने आपण रोजच्या जेवणामध्ये वापरतो. खड्या मसाल्यांमध्ये दालचिनीची पाने असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे कापूर. आपण अनेकजण देवाच्या पूजेसाठी कापूर वापरत असतात त्याच बरोबर आयुर्वेदामध्ये देखील कापूराचा वापर केला जातो. आपल्याला या कापूराच्या तीन ते चार वड्या घेऊन बारीक पावडर करून घ्यायची आहे.
त्यानंतर आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लिंबाचे तेल घ्यायचे आहे. कडूलिंबाचे तेल देखील मच्छर पळविण्यासाठी महत्त्वाचे ठरते. आता आपल्याला मातीच्या दिव्यांमध्ये दोन ते तीन चमचे कडूलिंबाचे तेल टाकायचे आहे. या दिव्यात कापूर टाकायचा आहे म्हणजे कापूर पावडर टाकायची आहे. जर आपण दोन चमचे तेल घेणार असू तर एक चमचा कापराची पावडर दिव्यामध्ये टाकायची आहे.
आणि त्यानंतर तेलामध्ये मिक्स करायचे आहे. त्यानंतर हे तेल आपल्याला दालचिनी च्या पानांवर लावून घ्यायचे आहे. या पानांना जाळायचे आहे यामधून येणारा धूर मच्छर, डास यांना पळून लावेल. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे कारण संध्याकाळी आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणात मच्छर येत असतात. जर तुमच्या घरी दिवसाचे मच्छर येत असतील तर तुम्ही हा उपाय दिवसा देखील करू शकता.
आपण यामध्ये दालचिनीच्या पानांचा उपयोग केला असल्यामुळे घरांमध्ये एक सुगंध देखील दरवळेल. हा उपाय तीन-चार दिवस देखील केल्यास मच्छर येणे कमी होईल. कारण हा जो सुगंध आहे तुमच्या घराच्या भिंतींवर देखील असेल तर मच्छर आपोआप येणे बंद होईल. दुसरा उपाय आपण आता इथे जाणून घेणार आहोत.
आपल्याला सर्वप्रथम कापसाची वात घ्यायची आहे. आणि मातीच्या दिव्यामध्ये जे आपण तेल घेतलेले आहे. या तेलामध्ये आपल्याला ही वात ठेवून हा दिवा तेटवून ठेवायचा आहे. या तेलामध्ये आपण दालचिनीच्या पानांचा चुरा देखील करून टाकू शकतो. यामुळे देखील मच्छर येणे कायमचे बंद होऊन जाईल. आपण बाहेर मिळणारे काही अगरबत्त्या कॉइल देखील वापरू शकतो पण त्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात हानी होऊ शकते.
पण हा घरगुती उपाय केल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. वरील माहिती आवडली असल्यास आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.