भारतातील कोणती आहे सर्वात बेस्ट क्रीम.? माहिती आहे का.? तुम्ही पण हीच क्रीम वापरता का.? मग एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

सुंदर दिसणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सुंदरतचे चाहते सगळेच असतात. सुंदर दिसण्यासाठी आज काल चेहर्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. चेहरा गोरा, चमकदार दिसण्यासाठी अनेक क्रीम तसेच लोशन चेहर्यावर लावले जातात. आज काल काम मिळवण्यासाठी खूप ठिकाणी आपला चेहरा आपली जीवनशैली विचार पूर्वक पडताळली जाते. मानवाला सुंदर दिसण्याचे आकर्षण अगदी प्राचीन काळापासूनच आहे. हे आपल्याला उत्खननात मिळालेल्या पुरव्यांमूळे दिसून येते.

आधी ही मानव साज-शृंगार करत असे. जसे जसे जग बदलत गेले त्यासोबतच या शृंगारात देखील बदल होत गेला आहे. आज काल वाढत्या लोकसंख्ये सोबत प्रदूषण देखील वाढत आहे आणि यामुळे तुमचा चेहरा खराब होवू शकतो. मित्रांनो प्रदूषित हवा, पाणी व बाहेरचे खाण-पान याने तुमचा चेहरा काळपट व कोमेजलेला दिसू लागतो. हा काळपट पडलेला चेहरा गोरा, चमकदार व तेजस्वी बनवण्यासाठी आज काल बाजारात अनेक क्रीम मिळू लागल्या आहेत.

मात्र सगळ्याच क्रीम आपल्या चेहर्याच्या त्वचेसाठी उत्तम असतीलच असे नाही. होय यातील काही तुमच्या त्वचेवर अॅलर्जी व लालचट्टे देखील निर्माण करु शकतात. काही क्रीम केमिकल रसायनाच्या मदतीने बनवल्या जातात त्यामुळे त्या आपल्या शरीरासाठी अत्यंत अपायकारक ठरतात. म्हणूनच तुमच्या या समस्येचे समाधान आज आम्ही घेऊन आलो आहोत. आमच्या या लेखात तुम्हाला कोणत्या क्रीम वापराव्या व कोणत्या नाही याची सविस्तर माहित आम्ही देणार आहोत.

हे वाचा:   जेवण बनवताना ह्या टिप्स आजमावून बघा.! स्वयंपाक बनवणे होईल आणखी सोपे.! महिलांनी नक्की वाचा.! वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.!

हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे म्हणून आमचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. आज काल चेहरा ताजा तवाणा दिसण्यासाठी आपण आंघोळी नंतर आपल्या चेहर्यावर आपण अनेक क्रीम लावतो. मात्र बाजारात मिळणार्या या क्रीम तयार करताना यात अनेक प्रकारचे टाॅक्सीक रसायाने टाकली जातात. याने तुमचा चेहरा थोड्या काळासाठी त्वरित उजळून दिसतो मात्र काही काळाने चेहर्यावर तेल जमा होवून पुन्हा एकदा चेहरा काळपट दिसू लागतो.

सोबतच जर तुम्ही रोज-रोज या रासायनिक क्रीमचा वापर करत असाल तर काही वर्षानंतर तुमच्या चेहर्यावर अक्ने उठू लागतात सोबतच चेहर्यावर सुरकुत्या येण्यास सुरवात होते. बाजारात मिळणार्या केमिकल युक्त क्रीम मध्ये समाविष्टीत केलेले घटक जर तुम्ही पाहिले तर यात एखाद दुसरा नैसर्गिक घटक असतो मात्र बाकी सर्व घटक हे कृत्रिम प्रकारे बनवले गेलेले असतात आणि जर या घटकांचा तुम्ही वापर आपल्या नाजूक त्वचेवर करत असाल तर तुमची त्वचा लवकरच खराब होवू लागेल.

त्वचा निस्तेज होईल व लवकर सुरकुत्या येवून तुम्ही म्हातारे दिसू लागाल. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या समस्येवर नक्की समाधान काय ? खोबरेल तेल अगदी लहानपणापासूनच आपल्या सर्वांच्या परिचयाचा घटक आहे. खोबरेल तेल हे पोषक तत्वांनी भरलेले आहे. या मध्ये अनेक जीवनसत्व असतात तुम्ही तुमच्या चेहर्यावर रोज रात्री झोपण्याच्या आधी खोबर्याचे तेल लावा. याच्या रोज वापराने तुमची त्वचा चमकू लागेल. चेहरा नैसर्गिकरित्या ताजा तवाणा बनवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.

हे वाचा:   नारळाच्या स्क्रबने चेहरा गोरापान केला! बऱ्याच लोकांना माहिती नाहीये ह्या नारळाच्या स्क्रब चे जबरदस्त फायदे.!

चेहर्यावरचे काळे डाग व पूरळे देखील गायब करण्यासाठी खोबर्याचे तेल एक राम बाण उपाय आहे. या सोबतच खोरफडीचे जेल देखील चेहरा चमकवण्यासाठी एक चांगला फायदेशीर उपाय आहे. या कोरफडीचे अनेक फायदे आहेत. कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, अॅसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते.

कोरफड जेल आपल्या त्वचेला रोज लावल्यास त्वचा चमकदार दिसू लागेल. डे’ड स्किन देखील पुन्हा जिवित होण्यास मदत करेल. म्हणूनच बाजारू क्रीम वापरण्या ऐवजी आता नैसर्गिक व निर्धोक उपाय वापरा चेहरा सुंदर व साजूक बनवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.