मा-सिक पा-ळी दरम्यान कधीही करू नये या चुका…! आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल!

आरोग्य

प्रत्येक वाढत्या वयातील मुलींना व स्त्रियांना दर महिन्याला मा-सिक पा-ळी येत असते. मा-सिक पा-ळीच्या दिवसांमध्ये आहारावर व स्वच्छतेवर योग्य लक्ष देणे गरजेचे असते. ज्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या पासून वाचता येते. अशा अनेक महिला आहेत ज्या या दिवसांमध्ये स्वच्छता पाळत नाहीत तसेच अनेक अशा गोष्टी करतात ज्या मा-सिक पा-ळीच्या दिवसात करायला नको. या चुकीच्या सवयी केल्यामुळे आपल्याला आयुष्यभरासाठी आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही या लेखाद्वारे मा-सिक पा-ळी मध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल आपणांस माहिती देणार आहोत.

१. सॅनिटरी पॅड व टॅम्पोन्सचा योग्य वापर- काम व नोकरी करणाऱ्या महिला संपूर्ण दिवसभर एकच पॅड वापरतात.  एक पॅड जास्त तास वापरल्यामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकते, ज्यामुळे गजकर्ण, नायटा, खाज अशा प्रकारच्या स्किन इन्फेक्शनच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. आपल्या सोयीनुसार दोन ते तीन तासांमध्ये सॅनिटरी पॅड नियमितपणे बदलले पाहिजे. जर टॅम्पोन्स वापरत असाल तर चार ते सहा तासांमध्ये ते बदलावे.

२. इंटिमेट हायजिन लिक्विड व वाइप्सचा योग्य वापर- आजकाल प्रसारमाध्यमांमधील अनेक जाहिराती व बाजारांमध्ये इंटिमेट हायजिनच्या नावाखाली अनेक प्रकारच्या वाईप्स व केमिकलयुक्त लिक्विड वापरण्याचा सल्ला दिला जातो, मात्र मासिक पाळीच्या दिवसांमध्ये असे  वाईप्स आणि लिक्विड वापरल्यामुळे आपल्याला त्यातील केमिकलचा दुष्परिणाम आयुष्यभरासाठी भोगावा लागू शकतो. इंटिमेट हायड्रोजन लिक्विड आणि वाईप्स यांच्या निर्मितीमध्ये केमिकलचा वापर केलेला असतो. म्हणून मा-सिक पा-ळीच्या दिवसांमध्ये या वस्तूंना वापरणे टाळावे.

हे वाचा:   पुन्हा पुन्हा होणारी पाठ दुखी कायमची होईल बंद.! पाठदुखी चे हे असतात कारणे.! उतारवयात जाण्याआधी नक्की वाचा.!

३. पेन किलर गोळ्या खाणे-  बऱ्याच महिलांना मासिक पाळी मध्ये होणाऱ्या पोटदुखी, कंबरदुखी तासारख्या त्रासांवर व दुखण्यांवरपेनकिलर टॅबलेट किंवा पेनकिलर औषधे खाण्याची सवय झालेली असते. सारखे-सारखे पेन किलर गोळ्या व अौषधे खाल्ल्या तर त्याचा दुष्परिणाम स्त्री- आरोग्यावर होत असतो. मासिक पाळी मधील पोट दुखी, कंबरदुखीवर घरगुती उपाय करून व गरम पाण्याचा शेक देवून देखील दुखणे कमी करता येऊ शकते.

४. अति व्यायाम करणे-  काही महिलांना व्यायामाची सवय असल्यामुळे, मा-सिक पा-ळीच्या दिवसांमध्ये देखील त्या महिला अति प्रमाणात व्यायाम करतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये आरामाची आवश्यकता असते. या दिवसांमध्ये व्यायाम करू नये. व्यायाम केल्यामुळे शरीर जास्त थकते व त्यामुळे अशक्तपणा देखील जास्त वाढू शकतो. याकरता या दिवसांत शक्यतोवर आरामच केला पाहिजे!

हे वाचा:   भाता मुळे खरचं चरबी वाढते का.? भात खावा की चपाती.? वजन कमी करण्यासाठी काय खायला हवे.!

५. फास्ट फूड खाणे-  बऱ्याच महिलांना बाहेरचे फास्टफूड, तिखट, नमकीन, तळलेले व खारवलेले पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र मासिक पाळीच्या दिवसांमध्ये असे बाहेरचे पदार्थ तसेच लोणच्यासारखे चटपटीत तिखट खारट अशा चवींनी युक्त पदार्थ व स्नॅक्सचे पदार्थ खाणे अतिशय चुकीचे असते. यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होत असते व त्याचा परिणाम मासिकपाळी चक्रावर होत असतो.

या होत्या काही अशा सवयी ज्या महिला व मुली कळत- नकळत करत असतात. आपणही अशा चुकीच्या सवयी लावून घेतल्या असतील, तर त्या वेळेत बदलून टाका अन्यथा त्याचा भविष्यांमध्ये आपल्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होण्यास कारणीभूत होऊ शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *