ही आहे जगातील सर्वात ताकदवान फळभाजी, एकदा खाल्ली की हे काही आजार कायमचे दूर जातात.!

आरोग्य

जसा पावसाळा सुरू झाला की वेगवेगळया फळभाज्या पालेभाज्या येण्यास सुरुवात होत असते. यामध्ये अनेक आरोग्यासाठी उपयुक्त असे काही फळभाज्या आणि पालेभाज्या असतात. कंटोळी ही देखील एक फळभाजी असून पावसाळ्यात येत असते याच्या सेवनाने अनेक आजार दूर केले जाऊ शकतात. आजच्या लेखात आपण या विषयी चे फायदे जाणून घेणार आहोत.

कंटोळी साधारणपणे पावसाळ्यात येत असते. त्याचे अनेक आरोग्य फायदे पाहता, जगभरात अनेक ठिकाणी याची शेती करणे सुरू झाले आहे. याची लागवड प्रामुख्याने भारताच्या पर्वतीय प्रदेशात केली जाते. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे सांगितले जातात. हे फळभाजी फायटोन्यूट्रिएंट्सचा एक मोठा स्त्रोत आहे, जो फक्त काही वनस्पतींमध्ये आढळतो.

हा पदार्थ मानवी आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो आणि अनेक रोगांपासून बचाव करण्यास मदत करतो. कंटोळीमध्ये प्रथिने आणि लोह भरपूर असते, तर कॅलरीजचे प्रमाण कमी असते. जर तुम्ही 100 ग्रॅम कंटोळी वापरता, तर तुम्हाला 17 कॅलरीज मिळतात. जर तुम्ही देखील वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आहारात कंटोळीचा नक्कीच समावेश करा.

हे वाचा:   ह्या वनस्पतीचा चमत्कार फारच थोड्या लोकांनी अनुभवला आहे.! ज्यांनी ज्यांनी या वनस्पतीला असे वापरले त्यांनी या भयंकर रोगातून मुक्ती मिळवली आहे.!

कॅनटोनॉईड्स सारखे ल्यूटिन कंटोळीमध्ये असते, जे अनेक प्रकारचे नेत्र रोग, हृदयरोग आणि अगदी कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे पचन सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावते. कंटोळीची खास गोष्ट म्हणजे भाजीशिवाय त्याचे लोणचेही बनवता येते. जर तुम्हाला त्याची भाजी खायची नसेल तर लोणचे सुद्धा खाऊ शकता.

कंटोळी आयुर्वेदात एक औषध मानले जाते, जे अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. ही भाजी सहसा पावसाळ्यात आढळते, यामध्ये एलर्जी-विरोधी आणि वेदनशामक गुणधर्मांमुळे, ती हंगामी खोकला, सर्दी आणि इतर अॅलर्जी दूर ठेवण्यास मदत करते. अशा प्रकारच्या अनेक आजारांसाठी ही वनस्पती अतिशय उपयुक्त मानली जाते.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी देखील कमी होते कारण ही वनस्पती इन्सुलिनने समृद्ध आहे. अशा लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी याचे नक्की सेवन करायला हवे. हे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते, कारण त्यात बीटा कॅरोटीन, ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन सारख्या विविध फ्लेवोनोइड्स असतात, जे त्वचेसाठी संरक्षक ढाल म्हणून काम करतात.

हे वाचा:   रक्तातली साखर कायमची घालवायची असेल तर हा उपाय करावाच लागेल.! अनेक लोकांच्या शुगरच्या गोळ्या फेकून द्याव्या लागल्या आहेत.!

या वनस्पतीला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की लिहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *