हातपाय जाम झाले आहेत का.? हाडा मधून कटकट आवाज येत असेल तर हा उपाय नक्की करा.! लाखो रुपयांची बचत होईल.!

आरोग्य

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणामध्ये गारवा पसरलेला असतो. या गारव्याचा परिणाम आपल्या शरीरावर देखील पाहायला मिळतो.आपल्यापैकी अनेकांना गुडघेदुखी,कंबर दुखी यासारख्या वाताच्या समस्या त्रास देऊ लागतात.हिवाळ्यात आणि पावसाळ्यात जास्त प्रमाणात या समस्या जोर धरतात कारण की वातावरणामध्ये थोडाफारही गारवा आला तरी हाडांना हे सहन होत नाही म्हणूनच अनेकांना चालायला त्रास होतो.

हाता पायांना सूज येते, सांधे दुखू लागतात व थोडे जरी चालले तरी वेदना होतात यासारखे समस्यांमुळे अनेकांना जीवन नकोसे होऊन जाते. पायऱ्या चढताना – उतरताना खूप वेदना सतावत असतात, अशावेळी आपल्यापैकी अनेक जण डॉक्टरांकडे जाऊन औषध उपचार करतात परंतु वेळेवर औषध उपचार करून देखील फारसा काही फरक जाणवत नाही. जर तुम्हाला देखील या पावसाळ्याच्या दिवसात गुडघेदुखी, कंबर दुखी यासारख्या वाताच्या समस्या सतावत असतील तर तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही एक उपाय घेऊन आलेलो आहोत.

हा उपाय केल्याने तुम्हाला त्वरित फरक जाणवेल आणि तुम्ही काही दिवसांमध्येच व्यवस्थित चालू शकाल. चला तर मग आपल्या हाडांचे आरोग्य मजबूत बनवण्यासाठी जाणून घेऊया एक महत्वाचा उपाय. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो अगदी एक रुपयांमध्ये उपलब्ध होतो. या पदार्थामुळे आपल्या शरीराला काही प्रमाणात कॅल्शियम मिळते आणि म्हणूनच आपल्या हाडांचे आरोग्य देखील मजबूत राहते. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला चूना लागणार आहे.

हे वाचा:   अतिशय लाखमोलाचा उपाय.! फक्त एक कप भरून प्या, सर्दी, खोकला, घशाचे इन्फेक्शन कायमचे विसरा.!

हा चूना पानपट्टीवर सहज उपलब्ध होतो व याची किंमत देखील एक रुपया इतकी असते. या चुन्यामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शियम चे प्रमाण जास्त असते म्हणून आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला चुना वापरायचा आहे परंतु हा चुना वापरताना आपल्याला त्याचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला तोंड येण्याची शक्यता असते. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला अगदी थोडसं म्हणजे गहूच्या आकाराएवढा चुना आपल्याला घ्यायचा आहे.

हा चुना आपल्याला एका वाटीभर दही मध्ये टाकायचे आहे. दही मध्ये देखील असे अनेक औषधी गुणधर्म असतात तसेच कॅल्शियम असते जी तुम्हाला ऊर्जा प्रदान करते. दही मध्ये चूना मिक्स केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे, जेणेकरून जिभेला चुना लागणार नाही व त्यानंतर हे मिश्रण आपल्याला सेवन करायचे आहे, असे केल्याने आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढेल व परिणामी हाडे देखील मजबूत बनतील.

बहुतेक वेळा गारव्यामध्ये हाडाचा आवाज येऊ लागतो आणि ठीसुर बनतात.हाडांमध्ये वंगण संपून जाते. या सगळ्या समस्या कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे होत असते. आजच्या लेखांमध्ये सांगितलेला आपण उपाय केल्याने आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भरून निघणार आहे त्याचबरोबर सांधेदुखी यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला अजून दुसरा एक पदार्थ लागणार आहे ते म्हणजे एप्पल सीड विनेगर.

हे वाचा:   वजन वाढवायचे असेल तर याहून सोपा उपाय नाही, दुबळ्या पतल्या लोकांसाठी आहे हे अमृता समान, आठवड्याभरातच वजन भरभर वाढले जाईल.!

हे विनेगर बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा व्हिनेगर आपल्याला मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला सेवन करायचं आहे,यामुळे देखील आपल्या हाडांचे आरोग्य मजबूत राहते परंतु हे विनेगर सेवन करताना थेट दातांचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्या कारण की विनेगर संपर्क दात थेट दातांना आल्यावर आपल्या दातांवरील पांढरा तर कमी होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे मिश्रण सेवन करायचे आहे.

आजच्या या लेखामध्ये सांगितलेले दोन्ही उपाय जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुमच्या शरीरातील सांधेदुखी, गुडघेदुखीची समस्या कायमस्वरूपी दूर होईल व वातावरणामध्ये झालेला बदल तुमच्या शरीराला त्रास देणार नाही तुमच्या हाडांच्या समस्या पूर्णपणे दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.