९० वर्षाचा म्हातारा ही आता धावू लागेल.! एका मालिश ने कमालच केली.! आतापर्यंतचा सर्वात सोपा आणि असरदार उपाय.!

आरोग्य

मित्रांनो माणूस किती ही श्रीमंत असला अथवा त्याच्या जवळ किती ही पैसा धन-दौलत असली तरी ही त्याचे आरोग्य चांगले नसेल तर या वैभवाचा काडी मात्र फायदा नाही. आरोग्य हीच खरी धन संपदा. आपले शरीर एक अवघड यंत्र आहे. शेकडो वर्षे कठोर अभ्यास केल्यानंतर आता कुठे शास्त्रज्ञ काही प्रमाणात शरीरावर निदान करण्यास यशस्वी झाले आहेत. मानवाला दीर्घायुष्यी बनायचे असेल तर सदैव निरोगी राहणे फार गरजेचे आहे.

मात्र आज काल आपल्या परिसरात आपण प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजाराने अथवा त्रासाने ग्रस्त झालेले पाहतो. या मधीच एक सध्याच्या वेळेला अत्यंत सामान्य झालेले आजार म्हणजे सांधेदुखी तसेच स्नायूंचे दुखणे. हा आजार फार मोठा भयानक आजार नाही आहे. मात्र आजच्या धावत्या जगात टिकायचे असेल तर मेहनत करणे फार गरजेचे आहे. परंतू जर तुम्हाला सांद्याचे दुखणे अथवा स्नायू दुखी असेल तर तुम्ही कामात खूपच मागे पडू लागता.

हे दुखणे जास्त झाल्यास असह्य बनते. अश्या वेळी त्वरित आरामासाठी आपण वेदनाशमाक गोळ्या तसेच औषधे घेतो. या गोळ्या औषधांनी तुम्हाला काही वेळासाठी आराम मिळतो मात्र अश्या प्रकारच्या गोळ्या औषधांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. तुम्ही सुद्धा अश्या प्रकारच्या त्रासाने त्रस्त असाल तर आता निश्चिंत व्हा कारण आज आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण व घरगुती उपाय घेवून आलो आहोत.

हे वाचा:   शरीरात जमा झालेली घाण अशी बाहेर काढावी.! सगळ्यात सोपी पद्धत.! आजार तुमच्या पासून हातभर लांब राहतील.!

ज्याने तुम्ही तुमचे दुखणे काही काळतच गायब होवून जाईल ते ही कायमचे! हो हा अत्यंत नैसर्गिक आहे याचा तुमच्या शरीरावर कोणता ही दुष्परिणाम होत नाही. हा उपाय तुम्ही घरीच बनवू शकता यासाठी काही जास्त खर्च करण्याची गरज नाही. आता वेळ न घालवता चला पाहूया हा उपाय. सर्व प्रथम पाहूया सांधेदुखी अथवा स्नायूंचे दुखणे शरीरात निर्माण होण्याचे कारण. आजू बाजूला वाढते प्रदूषण व वयानुसार होणारी शरीराची झिज.

तसेच शरीराला वयानुसार न मिळणारे योग्य पोषण यामूळे तुम्हाला सांधेदुखी व स्नायूंचे त्रास होवू शकतो. जास्त मेहनत करुन योग्य आराम तसेच झोप न घेतल्यामुळे देखील तुम्हाला हा आजार होवू शकतो. कांदा हा आपल्या सर्वांचीच फळभाजी आहे.
जर तुम्ही कांदा प्रेमी असाल तर कांदा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण कांद्यात कमी कॅलरीज आणि जास्त पोषक तत्वे आढळतात.

दुसरीकडे, कांद्यामध्ये जीवनसत्व ब व फोलेट आणि पायरिडोसिन पुरेशा प्रमाणात असते, जे तुमच्या शरीरातील चयापचय, मज्जातंतूंचे कार्य आणि लाल रक्तपेशी वाढवण्याचे काम करतात. म्हणूनच हा घटक तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. दुसरा घटक आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे लसूण. लसूण शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे. लसूण खाण्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते तर चांगले कोलेस्टेरॉल वाढते.

हे वाचा:   दहा दिवसात दहा किलो वजन कमी करणे शक्य आहे का.? हा एक उपाय अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवेल.!

लसूण खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच लसूण खाल्याने मधुमेह होण्याचा धोकासुध्दा कमी होतो. यामुळे दोन कांदे व पाच ते सहा लसणी दोन्ही पदार्थांना मिक्सर मध्ये बारीक वाटून याची पेस्ट बनवून घ्या. या नंतर एरंडेलचे 250 मि.ली. तेल घ्यावे. एरंडेल तेल एरंडाच्या बिया पासून तयार केली जाते. एरंडाच्या तेलाचा वापर हजारो वर्षांपासून निरोगी राहण्यासाठी केला जात आहे.

वेदामध्ये देखील एरंडाच्या तेलाला अधिक महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे आयुर्वेदानुसार केस गळतीसाठी आणि त्वचेसाठी रामबाण उपाय ठरतो. गुढगे दुखी अथवा सांधेदुखी साठी एरंडेल तेल हे अतिशय गुणकारी आहे. म्हणून कांदा व लसणीची पेस्ट एरंडेल तेलात मिक्स करुन मंद वाफेवर दहा मिनिटे गरम करुन घ्या. रात्री झोपण्यापूर्वी रोज रात्री दुखण्याच्या भागांवर याची मालिश करा आणि काही दिवसांतच तुमचे दुखणे सांध्याचे असो या स्नायूंचे त्वरित गायब होवून जाईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.