फक्त दोन लिंबू असे वापरून तुम्ही मूळव्याधच्या त्रासापासून कायमचे मुक्त होऊ शकता.! मूळव्याध असेल तर एकदा हा उपाय करूनच बघा.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आपण निरनिराळ्या आजारांविषयी माहिती बघतच असतो. आज या लेखा मध्ये आम्ही तुम्हाला मुळव्याध /बवासीर /पाइल्स.. अगदी कितीही जुनी असली तरीही कसे ठीक करायचे? हे सांगणार आहोत. हा त्रास मुळापासून संपवण्याचा हा अत्यंत प्रभावशील उपाय आपण आज बघणार आहोत. हा उपाय सलग तुम्ही सहा ते सात दिवस करायचा आहे. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हा प्रयोग करायचा आहे.

हा आजार खूप भयंकर आहे. आपल्या आतड्यांना सूज येते, रक्त पडते. खूप जास्त त्रास होतो. जळजळ होते, साधी मुळव्याध आणि रक्त पडणारे मुळव्याध असे दोन प्रकारच्या मुळव्याधी असतात. दीर्घकाळासाठी मुळव्याध ठीक झाली नाहीतर कॅन्सरचा धोका असू शकतो. रक्त मूळव्याधीमध्ये जास्त प्रमाणात रक्त गेल्याने शरीर कमजोर बनते.

हा त्रास होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे खाण्यापिण्याचे सवयी. जे लोक हिरव्या पालेभाज्या, डाळींच्या सालि, तंतुमय युक्त पदार्थांचे सेवन करत नाहीत आणि खूप जास्त प्रमाणात फास्टफूड खातात त्यांना मूळव्याध होण्याची भीती असते. कमी पाणी पिल्याने ही हा त्रास उद्भवतो. शरीरातील आकड्यांमध्ये पाण्याचा अभाव असल्याने त्या अवयवांमध्ये आर्द्रता राहत नाही.

हे वाचा:   कुठलाही आजार यापुढे टिकला तर बोला, फक्त दोनच पाने काम तमाम करतील.!

परिणामी शरीरातील उष्णता भडकते. यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. खूप मोठ्या प्रमाणावर तळलेले, तिखट चमचमीत खाणे, खारट पदार्थ खाणे यामुळे ही शरीरातील उष्णता वाढते आणि पचनक्रिया बिघडायला सुरुवात होते. आणि हळूहळू हे मूळव्याधीचे रूप धारण करते. म्हणूनच प्रमाणात पाणी प्यावे आणि आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा भरपूर समावेश असावा.

दही आणि सलाड याचेही प्रमाण आहारात वाढवावे. मुळव्याधी वर दोनच उपाय आहेत. एक आहे ऑपरेशन दुसरा आहे प्रिकॉशन. वेळीच खबरदारी घेतली तर मुळव्याध होण्याची शक्यता कमी होते. पुढे सांगितलेला घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा यामुळे तुमची मूळव्याधीची समस्या मुळापासून नष्ट होईल. एक ग्लास गाईचे कच्च थंड दूध घ्या.

गाईचे उपलब्ध नसल्यास म्हशीचे दूध घेतले तरीही चालेल. गरम करून थंड केलेले दूध दही चालेल. सोबतच आपल्याला लागणार आहे अर्ध्या लिंबाचा रस. लिंबू आणि गाईच्या दुधाचा एकत्रित प्रयोग हा मुळव्याधीवर एक रामबाण उपाय आहे. हा उपाय आयुर्वेदिक असल्याने याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. हा उपाय करताना आपल्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्यावे.

हे वाचा:   ना कसल्या गोळ्या ना बाम.! तीन दिवसात सांधे दुखी, गुडघे दुखी गायब झाली म्हणून समजा.! आयुष्यात पुन्हा कधी दुखणार नाही.!

आहारामध्ये डाळींचे आणि फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे. लिंबू रस व गार दूध एकत्र करून न हलवता लगेचच पिऊन टाका. दही, ताक, मठ्ठा चे प्रमाण वाढवा. दह्यात दोन चिमूटभर ओवा पावडर घालून सेवन करा. दोन्ही उपाय तुम्ही सोबत सलग सात दिवस करून पहा. तुम्हाला 100% खात्रीशीर फरक पडेल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.