जादुई औषध.! शरीरात असलेली सगळी घाण मिनिटात काढून टाकेल हा उपाय.! लिंबू जीवनसाठी अमृतवाहिनी ठरेल.!

आरोग्य

आपल्या आस पास सभोवतालची झाडे आता कमी झाली आहेत. आणि यामुळेच आपल्या परिसरात आज काल प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम आपल्या पृथ्वीवरील सजीव सृष्टी वर होत आहे. या सोबतच आता आपल्या धावत्या व व्यस्त जीवनशैली मुळे आपल्याला घरातील संतुलित आहार खाण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही.

अश्या वेळी आपण बाहेर मिळणारे तिखट तेलात तयार करण्यात आलेले पदार्थ जास्त ग्रहण करतो. मात्र या अरबट सरबट खाद्य पदार्थांचा आपल्या शरीराला काही ही फायदा होत नाही. याउलट शरीराला जंक फूड व फास्ट फूड खाल्याने हानी होवू लागते. म्हणूनच नियमित पणे या पदार्थांचे सेवन आपण टाळले पाहिजे. या व्यतिरिक्त आपण घरातील ताजे व संतुलित जेवण सेवन करावे.

मात्र या सर्व घटकांच्या प्रभावाने आपल्या शरीरात अनेक प्रकारचे टॉक्सीन्स तयार होतात जे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. जे आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकणे फार महत्त्वाचे आहे. डॉक्टर आपल्याला अनेक अनैसर्गिक व कृत्रिम गोळ्या व औषधे देतात. परंतू या गोळ्या जास्त प्रमाणात खाणे देखील पैसे देऊन दुखणे ओढवून घेणे होय. याने देखील आपल्या शरीराला हानी होवू शकते.

हे वाचा:   कॅन्सर होण्यामागे असते हे सर्वात मोठे कारण.! अनेक लोकांना ही माहिती नसेल.! अशा अन्नपदार्थ ना चुकूनही स्पर्श करू नका.!

म्हणून या प्रकारच्या गोळ्या व औषधे देखील जास्त खाणे टाळा. तुम्ही देखील अश्या या समस्येने त्रस्त असाल वर यावर एक कायम स्वरूपी उपाय शोधत आहात तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आमच्या या लेखात आम्ही तुम्हाला घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने टॉक्सीन्स शरीराच्या बाहेर कसे काढून टाकू शकतो. याचा एक साधा सोपा मात्र नैसर्गिक व रामबाण उपाय सांगणार आहोत.

हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे तुम्ही घरच्या घरीच काही सामग्रीचा वापर करून देखील तयार करू शकता. हा जास्त खर्चिक देखील नाही अगदी सर्व सामान्यांना हा उपाय चांगलाच परवडेल. हा एक अत्यंत आयुर्वेदिक उपाय असून याचा आपल्या शरीराला कोणता ही वाईट परिणाम होत नाही. चला तर आता वेळ नंतर दवडता पाहूया हा उपाय.

मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी सर्व प्रथम आवश्यक आहे लिंबाचा रस. लिंबू आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. लिंबाच्या रसात जीवनसत्त्व क मोठ्या प्रमाणावर असते. जे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी महत्त्वाचे आहे. दुसरा घटक जो आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे आल्याचा रस. सर्दी व खोकल्यासाठी आले हे एक रामबाण औषध आहे. आले बारीक मिक्सर मध्ये वाटून त्याची पेस्ट करून घ्या.

हे वाचा:   चिकन खाणारे जरा हे वाचा.! अशा कोंबड्या तुमचे आरोग्य दुप्पट तिप्पट चांगले करू शकतात.! खायचे असेल तर याच कोंबड्या खा.!

या उपाया करिता तिसरा घटक आहे लसूण पेस्ट. शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी लसूण एक उत्तम घटक आहे. सर्दी खोकला देखील याच्या सेवनाने दूर पळतात. पुढील घटक जो आपल्याला आवश्यक असेल तो आहे कांद्याचा रस. जेवताना कांदा आपण आवर्जून खात असतो. याने शरीरात थंडावा राहतो. या कांद्याचा देखील रस बनवून घ्या.

आता लिंबाचा रस, आल्याचा रस, लसूण व कांद्याचा रस या घटकांना एका ग्लासात पाण्यात टाका. पुढे यात एक मोठा चमचा भर मध टाका. लिंबाला कापा व मोठ्या फोडी करून या ग्लासात टाका. आता या मिश्रणाचे सेवन रोज रात्रीचा झोपण्याच्या आधी प्या व झोपा सकाळ पर्यंत तुमच्या शरीरातील सर्व वाईट घटक म्हणजेच टॉक्सीन्स शरीराच्या बाहेर नैसर्गिक पद्धतीने बाहेर फेकले जाईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.