अभ्यासातून स्पष्ट झाले आहे जी लोक हे फळे सतत खात असतात त्यांना चमचाभरही रक्त कमी पडत नाही.! कारण हे फळे आहेत रक्त बनवण्याची फॅक्टरीच.!

आरोग्य

काही केले तरी आपले आरोग्य हे बिघडणारच आहे परंतु त्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य असते. आजकालच्या या धकाधकीच्या तसेच धावपळीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याची काळजी घेणे विसरून जात असतो. परंतु असे करणे कधी कधी आपल्यासाठी पैसे आणि वेळ दोन्ही उडवणे असे होऊ शकते. कारण कधी ना कधी हे आरोग्य आपल्याला पैसे घालवण्यास भाग पाडत असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

अनेक वेळा आरोग्य संबंधीच्या लहान-सहान समस्या उद्भवल्या जात असतात. यामध्ये काही महत्वाची कारणे देखील असू शकतात. असेच एक कारण आहे ज्यामुळे शरीरामध्ये खूपच जास्त प्रमाणात समस्या निर्माण होण्यास सुरुवात होत असते. हे कारण म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता भासणे. शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासणे यामागे अनेक कारणे असू शकतात.

परंतु आपण कशाप्रकारे शरीरामध्ये रक्ताची कमतरता भरून काढली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही आजच्या या लेखाद्वारे देणार आहोत. या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशी काही फळे सांगणार आहोत ज्यांचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असेल. या फळांच्या सेवनामुळे शरीरामध्ये रक्ताची कमतरता भरून निघेल.

हे वाचा:   मूळव्याध झाल्यावर अनेक लोक ही एक चुकी करतात.! मूळव्याध ची अशी काळजी घेतली तर कायमचा त्रास नष्ट होऊ शकतो.!

जेव्हा तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असते, तेव्हा काही लक्षणे दिसू लागतात. यामध्ये अशक्तपणा, चक्कर येणे, निद्रानाश, थकवा यांचा समावेश आहे. हिमोग्लोबिनची कमतरता देखील रक्त तपासणीद्वारे शोधली जाऊ शकते. रक्ताचा अभाव, शरीरावर पिवळेपणा, डोळ्यांखाली काळी वर्तुळे सुरु होतात असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो.

पालक: अनेक वेळा डॉक्टर देखील पालक चे सेवन करण्यास सांगत असतात. पालक हिमोग्लोबिन वाढवण्याचा एक उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. हे व्हिटॅमिन बी 6, ए, सी, लोह, कॅल्शियम आणि फायबरमध्ये समृद्ध आहे. जर तुम्ही त्याचे नियमित सेवन केले तर शरीरातील रक्ताची कमतरता झपाट्याने पूर्ण होऊ शकते.

सफरचंद: सफरचंद चे आरोग्यासाठी किती फायदे आहेत हे सांगण्याची काही गरज नाही. अॅनिमियामध्ये सफरचंद खूप फायदेशीर आहे. जर दररोज एक सफरचंद खाल्ले तर ते शरीराच्या अनेक समस्या दूर होतात तसेच रक्ताची कमतरता दूर होते.

हे वाचा:   हे चूर्ण जणू अमृतच आहे, डोकेदुखी, पोटदुखी, सारख्या अनेक आजारावर एकच उपाय; स्त्रियांसाठी आहे खूपच फायदेशीर.!

डाळिंब: डाळिंबामध्ये भरपूर लोह असते, जे रक्त तयार करण्यासाठी आवश्यक घटक आहे. ते खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता नसते. त्यामुळे ज्या लोकांना आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढायची असेल अशा लोकांना या सर्व फळांचे सेवन नक्की करायला हवे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.