तापे मुळे जेवणाचा वास येणे.! तोंडाला कडूपणा येणे.! काहीच खावेसे न वाटणे.! यातले काही जरी वाटले की करायचे हे एक काम.!

आरोग्य

सर्दी ताप खोकला ही लक्षणे अतिशय कॉमन मानली जातात. कॉमन वाटत असली तरी ही लक्षणे खूपच त्रासदायक ठरत असते. अनेकदा आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणावरून ताप, सर्दी, खोकला इत्यादी प्रकारच्या अनेक समस्या उद्भवत असतात. आज कालच्या या काळामध्ये आजारी पडणे ही समस्या जरा भयंकर बनत चालली आहे.

कारण माणसाचे आरोग्य चांगले असेल तर असा मनुष्य कोणतेही कामे अगदी सहजपणे करू शकतो. ज्या व्यक्तीचे आरोग्य चांगले असते त्या व्यक्तीकडे काही नसले तरी चालते म्हणजेच आरोग्य हीच खूप मोठी श्रीमंती आहे यावरून असे आपल्याला समजते. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. अनेक लोकांना ऋतु बदल सहन होत नाही ऋतु बदलामुळे अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवतच असतात.

अनेकदा ताप आल्यानंतर आपल्याला एक समस्या खूपच जास्त प्रमाणात उद्भवते ती म्हणजे तोंडाला चव नसणे. ताप आल्यानंतर आपल्याला काहीच खाऊ वाटत नाही. आपल्या तोंडाला चव नसते. अशावेळी काय करायला हवे हे आपल्याला समजत नाही. यावर एक जबरदस्त असा उपाय सांगितला गेला आहे हा उपाय केला तर अशा प्रकारच्या समस्येपासून नक्की सुटका मिळेल.

हे वाचा:   संक्रमणाच्या काळात इम्युनिटी जबरदस्त वाढणार, फक्त आजपासून या दोन गोष्टी खाण्यास सुरुवात करा...!

हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम एक लिंबू द्यावे लिंबू हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे आपले पाचन तंत्र मजबूत बनत असते पोटाच्या अनेक विकारासाठी लिंबू खूपच फायदेशीर मानले जाते. तुम्हाला सर्वप्रथम हे लिंबू कापून घ्यायचे आहे त्यानंतर या लिंबामध्ये असलेल्या सर्व बिया काढून टाकायच्या आहेत त्यानंतर या वरती एक चमचा काळी मिरची पावडर टाकायची आहे व आपले खाण्याचे साधे मीठ टाकायचे आहे.

त्यानंतर हे अर्धे कापलेले लिंबू, चमचा च्या साह्याने किंवा चिमट्याच्या साह्याने गॅसवर थोडे गरम करून घ्यायचे आहे. यातून जो पर्यंत थोडासा फेस स्वरूपात पदार्थ बाहेर येत नाही तोपर्यंत याला गरम करून घ्यायचे आहे. ज्यावेळी हे चांगल्याप्रकारे गरम होईल त्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर याचे काही थेंब तोंडात टाकायचे आहे असे केल्याने तापेमुळे तोंडाला चव नव्हती ती पुन्हा येईल तसेच तुम्हाला कोणतीही गोष्ट खाण्याचे मन करत नसेल तर खाऊ वाटेल.

हे वाचा:   आठवड्यातून एकदा खावी ही फळभाजी, कधी विचारही केला नव्हता एव्हढा फायदा होईल, या तीन आजारांची होईल कायमची सुट्टी.!

असा हा सोपा उपाय तुम्ही अगदी सहजपणे घरगुती पद्धतीने करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.