या व्यक्तीने वर्षभर फक्त दररोज पाच सूर्यनमस्कार घातले त्यानंतर त्याचे शरीर झाले असे काही.! सूर्यनमस्कारला साधारण समजण्याची चुकी आज पासून तुम्ही करणार नाही याची खात्री.!

आरोग्य

आपले शरीर एक यंत्र आहे व याला काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. ही ऊर्जा तुम्हाला तुम्हाला रोजच्या जेवण खाण्यातून मिळते मात्र हे अन्न ताजे असणे फार महत्त्वाचे आहे. जर आपण वेळे च्या अभावाने रोज जंक फूड तसेच फास्ट फूड खात असाल तर तुम्हाला या खाद्य पदार्थचा वाईट परिणाम पुढे जाऊन झेलावा लागेल. मात्र आपले शरीर मजबूत व रोग मुक्त बनवायाच असेल तर आपल्या भारतीय संस्कृतीत एक सोपा उपाय आहे तो म्हणजे सूर्य नमस्कार.

सूर्या शिवाय सजीव सृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही. सूर्य नमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. पृथ्वी वरील सजीव सृष्टीचा दाता हा सूर्यच. सूर्यनमस्कार हा एक १२ आसनांचा ठरलेला चक्राकार क्रम आहे. हा योगाभ्यास शरीर, मन व श्वासाला एकत्र आणतो. ध्यानात जाण्याची ती पहिली पायरी आहे.वार्म-अप व योगासने यांना सांधणारा हा एक चांगला दुवा आहे. रिकाम्या पोटी हा कधीही केला तरी चालतो.

तथापि सकाळची वेळ यासाठी सर्वोत्तम असते कारण त्यामुळे तुमच्या शरीराचे पुनरुज्जीवन घडते व मन प्रसन्न होते. पुढील दिवसाला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज होता. दुपारी केल्यास शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. संध्याकाळी केल्यास आराम मिळण्यास मदत होते. सूर्य नमस्कार जलद केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते व वजन कमी होण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात सूर्यनमस्कारने का करावी..?

हे वाचा:   डास आता एकही घरात येणार नाही.! हा कांद्याचा उपाय केल्याने डास घरातूनच पळून जाईल, एकदा नक्की करून बघा.!

सूर्य नमस्कार ऊर्जादायी, ध्यानदायी व आरामदायी असतात. ते शरीराला लवचिक बनवतात व त्यांमुळे रक्ताभिसरण सुधारते. चांगले रक्ताभिसरण झाल्यास केस पांढरे होत नाहीत, ते गळत नाहीत, त्यांत कोंडा होत नाही व त्यांचे आरोग्य सुधारते. शरीरातील महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते. आपल्या अस्थि संस्था व पचन संस्था सुधारतात.

त्या बरोबरच वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे संतुलन साधले जाते. मुलांनी सूर्य नमस्कार का घालावेत..? सूर्यनमस्कार केल्याने मन शांत व एकाग्र बनते. आजच्या जीव घेण्या स्पर्धेच्या युगात, सूर्य नमस्कार हे मुलांच्या दिनक्रमाचा एक भाग असावेत. त्यामुळे सहनशक्ती वाढते व चिंता आणि अस्वस्थपणा कमी होतो, मुख्यतः परीक्षेच्या कालावधीत. सूर्य नमस्कारांचा नेहमी सराव केल्यास शारीरिक ताकद व जोम वाढतो.

भावी खेळाडूंसाठी हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. ज्यामुळे स्नायूंची शक्ती तसेच मणका व इतर अवयवांची लवचिकता वाढते. अगदी पाच वर्षांचे मुल देखील रोज सूर्यनमस्कार करणे सुरु करू शकते. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर एका देवतेचे नियंत्रण असते असे प्राचीन ऋषी मानत. आपली नाभी सूर्याशी जोडली आहे. म्हणून योगी सूर्यनमस्कार सकाळी करण्यास सांगतात.

हे वाचा:   रात्री झोपताना असे दूध पिल्यास मिळतो खूप फायदा.! आजार तुमच्यापासून दूरच थांबतील.! थकवा कायमचा पळवून लावा.! असे दूध एकदा नक्की प्या.!

यावेळी व्हिटामिन ‘डी’ देणारे सूर्यकिरण नाभीवर पडतात. सूर्यनमस्कार व ध्यानाच्या नियमित सरावाने नाभीचा आकार बदामाच्या आकारा पासून ते हाताच्या तळव्या इतका होऊ शकतो. नाभीचे हे प्रसरण, ज्याला दुसरा मेंदू म्हणतात, तुमची अंतर्ज्ञान क्षमता आणि स्पष्टता व केंद्रित दृष्टीकोन वाढवते. याविरुद्ध नाभीचे आकुंचन होणे म्हणजे नैराश्य व नकारात्मक विचारांनी घेरले जाणे.

सूर्य नमस्कारांच्या बहुविध फायद्यांमुळे शरीर आरोग्यदायी व मन शांत होते. म्हणूनच त्यांचा नियमित सराव करावा असे योगतज्ञांचे म्हणणे आहे. येथे सांगितलेल्या सूर्य नमस्कारासाठीच्या युक्त्या तुमचा सराव सुधारतील व त्याचे चांगले परिणाम दिसतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.