अनेक वर्ष जुन्या असलेल्या गजकर्णला एका झटक्यात बरे करा.! करल्यातला कडूपणा असा करायचा वापर.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना कधीनाकधी खाज,खरुज झालाच असेल किंवा आहे. आत्ता देखील कितीतरी जणांना हा आजार असेल. हा त्रास ज्यांना जास्त प्रमाणात घाम येतो अशा लोकांना होतो किंवा ज्यांना घाम येत नाही अशाही लोकांना होतो पण त्या ठिकाणी होतो तिथे आपल्याला जास्त प्रमाणात घाम येतो म्हणजेच गुडघ्यांच्या इथे, काखेत, गु’प्तां’ग भागात अशा प्रकारे ज्या अवयवांच्या ठिकाणी आपल्याला जास्त घाम येतो.

त्या त्या ठिकाणी खाज,खरुज होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यासाठीच आज आजचा आपला उपाय असणार आहे. आजचा आपला उपाय केल्याने शरीराला झालेली खाज लवकर दूर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम मुख्यतः आपल्याला इथे वापरायचे आहेत ते म्हणजे कारले.

कारले अँटी बॅक्टेरिअल असते त्यामुळे इथे आपल्याला कारल्याचा वापर करायचा आहे. आपल्यापैकी अनेक जणांना कारले आवडत देखील नसेल पण आपल्याला इथे ते भरपूर उपयोगात येणार आहे त्यामुळे आपल्याला एका छोट्या कारल्याचा वापर करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कारले छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आहे. कापून झाल्यानंतर या बारीक करून घेतलेल्या कारल्याच्या तुकड्यांना मिक्सर मध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

पेस्ट तयार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पेस्ट अगदी बारीक असली पाहिजे. त्यानंतर येथे आपल्याला कापूर वापरायचा आहे. आपल्याला जो कापूर घ्यायचा आहे तो आपण पूजेसाठी किंवा कोणत्याही कार्यासाठी वापरत असतो. हा कापूर आपल्याला बाजारपेठेमध्ये सहजपणे उपलब्ध होऊन जातो. कापूरचा वापर त्वचेसाठी खरोखरच उपयोगी असतो त्याचप्रमाणे कापूर वापरामुळे आपले इन्फेक्शन नाहीसे होण्यास मदत होते.

हे वाचा:   खोकत बसण्यापेक्षा एका वाटी मध्ये घ्या या तीन वस्तू.! आयुष्यात चुकून पण खोकला येणार नाही.! जबरदस्त उपाय.!

हा कापूर दोन प्रकारचा असतो. एक तुकड्यांमध्ये असतो तो आणि एक छोट्या छोट्या वड्या मध्ये येतो. तुम्हाला जो कापूर मिळेल तो कापूर तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही कापूर छोट्याछोट्या वडीमधून घेत असाल तर कापराच्या तीन ते चार वड्या आपल्याला इथे घ्यायचे आहेत. सोबतच आपल्याला येथे खोबरेल तेलाचा वापर करायचा आहे म्हणजेच नारळाच्या तेलाचा वापर करायचा आहे.

नारळाचे तेल हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयोगी असते आणि त्यामुळे त्वचेवरचे अनेक रोग नाहीसे होण्यास मदत होतेच पण त्याच प्रमाणे त्वचा मऊ, मुलायम राहण्यास मदत होते. त्याचबरोबर तेलामध्ये विटामिन ई असते म्हणून एक चमचा कारल्याची पेस्ट,एक चमचा कापूर आणि एक चमचा नारळाचे तेल हे एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि सहा ते सात दिवस दररोज हे नारळाचे तेल कापूर आणि कारल्याने हा बनवून घेतलेला उपाय आपल्याला वापरायचा आहे.

त्याच बरोबर आपल्याला ज्या जागी जास्त खाज येते किंवा त्या प्रभावित त्वचेची तेवढीच काळजी घेणे देखील गरजेचे आहे, जसे की ती जागा स्वच्छ ठेवणे. त्याच बरोबर स्वतःच्या गोष्टी वेगळ्या ठेवून तिथल्या म्हणजेच प्रभावित जागेवर असणाऱ्या जखमेची काळजी घेणे. अशा प्रकारच्या काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सोबतच आपण हा बनवलेला उपाय दररोज सात दिवस वापरायचा आहे,जेणेकरून ती जखम मुळापासून नाहीशी होण्यास मदत होईल.

हे वाचा:   टेन्शन फ्री व्हायचे असेल तर रोज सकाळ संध्याकाळ खाण्यास सुरू करा हे दोन पदार्थ.! कुठल्याही गोष्टीची चिंता कायमची जाईल आणि शांत झोप देखील लागेल.!

त्याचबरोबर त्या जखमेवर हलक्या हाताने मसाज करायचे आहे त्यामुळे आपली पेस्ट त्या जखमेच्या आत जाईल आणि कारल्याचा रसामुळे तिथल्या जागेवरचे किटाणू किंवा त्या जखमेवरचे बारीक किटाणू मरून जातील आणि तो खाज, खरुज लवकर बरा होण्यास मदत होणार आहे. एवढेच नाही तर एकदा हा खरुज नाहीसा झाला की तो परत येणार नाही.

यामध्ये वापरले गेलेले सर्व गोष्टी या घरगुती असल्यामुळे याचा आपल्या शरीरावर किंवा त्वचेवर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही उलट याचा फायदाच होणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.