देवपूजा करतांना फक्त या नियमांचे करा पालन; सर्व देवीदेवतांची विशेष कृपा लाभेल.!

अध्यात्म

श्री स्वामी समर्थ, घरातील देवपूजा करताना या 20 नियमांचे पालन करायलाच हवे. ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते, नित्य देवांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते, तेथे सुख, समृद्धी आणि सकारात्मक पवित्र वातावरण नेहमीच असते. दुःख, दारिद्य दूर होते. नित्य धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक अशा सूक्ष्म जंतूचा नाश होतो. घरातील वातावरण शुद्ध राहते. हिंदू पुराणानुसार देवपूजेचे हे काही महत्त्वाचे नियम ठरवलेले आहेत.

या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते, भगवंतांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते. महालक्ष्मी सह सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात. तर मग आता पूजा करताना लक्षात ठेवायचे नियम कोणते? चला तर मग याबद्दल जाणून घेऊया.

1. तुळशीची पाने 11 दिवसापर्यंत शिळी होत नसतात. त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात.

2. दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्तीसमोर ठेवला पाहिजे. तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी.

3. पूजेकरता कधीही तुटलेला, भग्न दिवा वापरू नये. तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही. त्यामुळे तुटलेला किंवा भग्न दिवा वापरू नये.

4. महादेवाला बेलाची पाने आवडतात, त्यांना ती अर्पण करावीत.

5. कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या स्वइच्छेने देवाला दक्षिणा ही नक्की द्यावी. दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे. निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असते. ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.

हे वाचा:   या खांबातून ऐकू येते संगीत, इंग्रजांनी खांब कापला आणि त्यात जे होते ते पाहून सर्व जन हैराण झाले...! जाणून घ्या काही रहस्यमय मंदिरे.!

6. प्रत्येक पूजेमध्ये तांदळाला अतिशय मह‌त्वाचे स्थान आहे. पूजेसाठी तांदूळ वापरावेत. तुकडे झालेले तांदूळ वापरू नये. हळदीचे पाणी करून त्यात तांदूळ पिवळे करून मगच ते तांदूळ पूजेसाठी वापरावे. हे अर्पण केलेले तांदूळ अत्यंत शुभ असतात. नेहमी पिवळे तांदूळ वापरावेत.

7. विड्याच पान देखील पूजेसाठी आवश्यक ठेवावी. वेलची, लवंग, गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर अति उत्तम. पूजेच्या मध्यभागी दिवा मधेच विझू नये याकडे लक्ष द्यावे. जर तसे झाले तर पूजेचे फळ मिळत नाही.

8. कोणत्याही देवाला पूजा, ध्यान, आसन, स्नान, धूप-दीप, अक्षत (तांदूळ), कुमकुम, चंदन, फुले (फुले), प्रसाद इत्यादींना आमंत्रित (आमंत्रित) करणे आवश्यक आहे.

9. भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाने जल अर्पण करू नये.

10. पूजेच्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता याचे काटेकोरपणे पालन करायला हवे. एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये. चामड्याची कोणतीही वस्तू, पूजा अर्चा करताना जवळ बाळगू नये. पूजा घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे, म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.

11. भगवान श्री विष्णूस प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे. देवी दुर्गा, सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.

हे वाचा:   झोपण्याच्या जागेवर एक गोष्ट कधीही करू नका; घरात येईल भयंकर गरिबी, जीवनात वाईट काळ सुरू होईल.!

12. कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता, इष्ट देवता, वास्तु देवता, ग्राम देवता यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवेत. पूजेसाठी सर्व देवतांचे आव्हान करायला हवे. पूजेच्या आधी देवांना स्रान घालावे, धूप, दीप प्रज्वलित करावे, हळदी कुंकू लावाव. तसेच पुष्प, बेलपत्र, चंदन, असणे गरजेचे असते.

13. आपण पूजेकरता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकवू नये, ते नेहमी हाताने सरकवावे.

14. आपण दररोज तुपाचे निरंजन लावावे, त्यामुळे घरातील सर्व वास्तु दोष आणि नकारात्म‌क ऊर्जा दूर होतात.

15. देव घराच्या वर अडगळीच्या वस्तू ठेवू नये, तसेच कोणतीही ओझे किवा साम‌नाचा पसारा देवघरावर ठेवू नये.

16 देवतांना पुष्पहार आणि फुले अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत.

17 भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्यात. श्री विष्णूंना चार, श्री गणेशाना तीन आणि शिवजींना अर्धी प्रदक्षिणा घालावी.

18. घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंच लोकपाल, षोडश माता, साती आसरा यांचीही उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे.

तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपण वरील काही गोष्टींचे पालन केले तर नक्कीच आपल्यावर देवाची विशेष कृपा झाल्याशिवाय राहणार नाही.