अन्नग्रहण करणे हे आपले दैनंदिन कार्य आहे. भोजन केल्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नसतो. शास्त्रामध्ये देखील अन्न हे पूर्णब्रम्ह असल्याचे सांगितले जाते. परंतु भोजन करत असताना आपण काही चुका अजिबात केल्या नाही पाहिजे ज्यामुळे आपल्याला जीवनामध्ये विशिष्ट प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
शास्त्रांमध्ये भोजन करण्यापूर्वी काही कामे आपण करायला हवीत त्याबद्दल सांगितले गेले आहे. भोजन करण्यापूर्वी आपण आपले दोन्ही पाय दोन्ही हात व तोंड चांगल्या प्रकारे स्वच्छ पाण्याने धुऊन काढावे व नंतरच भोजन करावे. भोजन करण्यापूर्वी हे पाचही अंग चांगल्या प्रकारे स्वच्छ धुऊन मगच भोजन करावे असे शास्त्रात सांगितले आहे.
शास्त्रांमध्ये हे देखील सांगितले आहे की जो व्यक्ती आपले पाय ओले करुन भोजन करत असतो त्याचे आयुष्य हे वाढले जात असते. त्याचबरोबर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करूनच भोजन ग्रहण करावे. याचा फायदा तुम्हाला होत असतो. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच यामुळे केलेले भोजन योग्यरीत्या पचते देखील.
दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण कधीही भोजन ग्रहण केले नाही पाहिजे. यामुळे शरीरामध्ये रोगराई वाढण्याची शक्यता असते. शास्त्रांमध्ये असे करणे अशुभ मानले गेले आहे. याच बरोबर शास्त्रांमध्ये हे देखील सांगितले आहे की कोणत्याही व्यक्तीने इतर कोणाचेही उष्टे अन्न ग्रहण करू नये. असे करणे खूपच अशुभ आणि चुकीचे मानले जाते.
अनेकदा आपण पाहिले असेल की पत्नी ही आपल्या पतीचे उष्टे अन्न ग्रहण करत असते. परंतु असे मानले जाते की यामुळे प्रेम वाढले जाते परंतु शास्त्रांमध्ये हे अत्यंत अशुभ आणि चुकीचे मानले गेले आहे. असे सर्वांनी टाळायला हवे. त्याचबरोबर पती आणि पत्नी ने एकत्र एकाच थाळीत भोजन ग्रहण करू नये.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.