फक्त एक ग्लास प्या.! वाटेल तेवढे वजन होईल कमी.! खूप उपाय करून थकले असाल तर हा शेवटचा उपाय करून बघा.!

आरोग्य

मित्रांनो प्रत्येकाला हल्ली अति लठ्ठपणा, वजन नियंत्रणात न राहणे, वजन वाढणे यासारख्या समस्या त्रास देत असतात. या समस्या जरी हलकाफुलक्या वाटल्या तरी या समस्यांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वजन वाढते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातील सर्व अवयवांवर त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो. बहुतेक वेळा आपण जे काही पदार्थ सेवन करतो त्या पदार्थांचे व्यवस्थितरित्या पचन होत नाही.

आपण जे काही अन्नपदार्थ सेवन करतो त्याचे विघटन होत नाही म्हणूनच खाल्लेले अन्न आपल्या पचन संस्थेद्वारा व्यवस्थित रित्या पचवले जात नाही यामुळे आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते. या चरबीमुळे आपल्या शरीरावर चरबीचा थर जमा होतो आणि शरीराचा आकार देखील बिघडतो. पोटावर, मानेवर, मांड्यांवर अतिरिक्त चरबी दिसू लागते.यालाच आपण अति लठ्ठपणा म्हणतो.

हा अति लठ्ठपणा दूर करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण व्यायाम, डायट पाळत असतात परंतु इतके सारे करून देखील शरीरावर हवा असलेल्या काही फरक आपल्याला दिसून येत नाही. काहीजण तर जेवण करणे देखील बंद करतात परंतु असं करणं चुकीचं आहे. आपल्या शरीराला अन्नपदार्थांची आवश्यकता असते म्हणून आपल्या शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक तत्व शरीराला वेळोवेळी देणे अत्यंत गरजेचे आहे.

आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने अति लठ्ठपणा काही दिवसांमध्येच कमी होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला जीरा लागणार आहे. जीरा हा आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतो.

हे वाचा:   दही मध्ये ही एक वस्तू टाका, दह्याची ताकद दहापट वाढेल, सर्दी खोकला असेल तर रात्रीत बरा होऊन जाईल.!

जिरा घरातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये चवीसाठी वापरला जातो परंतु आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये जिरे चे अनेक फायदे देखील सांगण्यात आलेले आहे. जिऱ्या मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वाताचा आजार झालेला असेल सांधेदुखी, कंबरदुखी यासारखे वाताच्या समस्या दूर करण्यासाठी जिरे लाभदायक ठरतात.

जिरे नियमितपणे सेवन केल्याने आपली पचनसंस्था देखील सुरळीतपणे काम करते. जिरे मध्ये असे अनेक घटक असतात जे तुमच्या शरीरातील घातक ऍसिड कमी करतात व शरीराची पचन संस्था सुरळीतपणे पार पडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. आता आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे अळशी. अळशी ही बाजारामध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. यामध्ये आपले पचन व्यवस्थित करण्याची क्षमता असते.

तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हृदयाचा आजार असेल तर तो देखील या बियांच्या सेवनाने दूर होतो. या बियांमध्ये आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल दूर करण्याची क्षमता असते आणि म्हणूनच या व्यक्तीने हृदयाच्या समस्या आहेत, या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये अळशीच्या बियांचा नक्की समावेश करायला हवा त्यानंतर आपल्याला दालचिनीचे तुकडे लागणार आहे. दालचिनी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. या पदार्थांमध्ये शरीरात उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात.

हे वाचा:   आंघोळ करताना आठवड्यातून एकदा तरी सगळ्या शरीराला लावा.! काळी पडलेली त्वचा होईल पांढरे शुभ्र.! सुंदर बनण्यासाठी याहून सोपा उपाय नसेल.!

बहुतेक वेळा अति लठ्ठपणामुळे आपल्या शरीरामध्ये र’क्तप्रवाह सुरळीत होत नाही. दालचिनी तुमच्या शरीरातील र’क्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी मदत करते आणि म्हणूनच दोन ते तीन तुकडे दालचिनीचे आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी लागणार आहे. आता आपल्याला एका कढईमध्ये जिरे अळशीच्या बिया आणि दालचिनीचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या साह्याने पावडर बनवायची आहे.

त्यानंतर एक ग्लासभर कोमट पाणी घेऊन आपण बनवलेली या तिन्ही पदार्थांची पावडर एक चमचा मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला सकाळी उपाशीपोटी सेवन करायचे आहे, असे जर आपण महिनाभर नेहमी केले तर तुमच्या शरीरामध्ये जमा झालेली अतिरिक्त चरबी अगदी मेणासारखी वितळू लागेल. तुम्हाला भविष्यात कधीच अति लठ्ठपणा, वजन जास्त वाढणे यासारख्या समस्या त्रास देणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.