हा डाएट प्लॅन पाळला तर या जगात कोणीही तुम्हाला वजन कमी करण्यापासून थांबवू शकत नाही.! बॉडी बनवण्यासाठी एवढे खावे लागते.!

आरोग्य

शरीरावर वाढणारी चरबी आपणास खूप त्रास देते. यामुळे आपण अनेक कामांमध्ये मंद होवू लागतो. सोबतच तुम्हाला अनेक असे अनेक आजार आपल्याला वजन वाढल्याने होवू शकतात. कोलेस्टेरॉल हा तर आजार आता अत्यंत सामान्य झाला आहे. शरीरात वजन वाढल्याने हृदयाच्या भोवताली देखील चरबी जमा होते व र’क्त प्रवाह सुरळीत होण्यापासून प्रतिबंध करते.

म्हणूनच माणसाचे वजन संतुलित असणे फार महत्वाचे आहे. संतुलित वजन असण्यासाठी आहार देखील संतुलित असणे आवश्यक आहे. मित्रांनो आज आपण बोलणार आहोत दैनिक आहारा बद्दल. होय आज आपण पाहणार आहोत आपला रोजचा आहार कसा असावा ज्याने तुमचे वजन संतुलित राहिल व जास्त असेल ते कमी होईल. या आहारामुळे तुमचे वजन तर कमी होईलच मात्र तुम्हाला अतोनात ऊर्जा देखील प्राप्त होईल.

काम करण्यासाठी शरीरात नवीन उमंग नवीन स्फूर्ति जागृक होईल. चला तर वेळ न घालवता पाहूया हा लेखा द्वारे पाहूया हा रोजचा आहार. सकाळी उठल्यावर मित्रांनो सर्व प्रथम आपण तांब्याच्या धातू पासून बनलेल्या भांड्यातले पाणी प्यावे. रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात हे पाणी ओतून ठेवा व सकाळी ते प्राशन करा. या पाण्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईलच मात्र तुमच्या शरीरात एक सकारात्मक शक्ती निर्माण होईल.

सोबतच पोट साफ होण्यास देखील मदत होईल. या नंतर तुम्ही फ्रेश होवून अंघोळ केल्यानंतर एक केळे व एक काळी मीरी यांना एकत्रित करुन त्यांचे मिश्रण करुन त्याचे सेवन करा. केळ्यात असे गुणधर्म असतात जे वजन वाढवण्यास मदत करतात मात्र रिकामी पोट केळे खाल्यास तुमच्या शरीरातील जास्त असलेली चरबी घटू लागेल. काळी मीरी अत्यंत गरम पदार्थ आहे ही देखील रिकामी पोट घेतल्यास वजन कमी होवू लागते.

हे वाचा:   कोणतेही जड काम केल्यावर थकवा येतो का.? हा जबरदस्त उपाय असा कुठलाही रोग बरा करतो.!

आता सकाळच्या नाश्त्याला बेसनापासून बनलेली पोळी व त्यासोबत दही याचे सेवन करा. बेसनाची पोळी बनवण्याची कृती अत्यंत सोपी आहे. एका तव्यात बेसन घ्या त्यात पाणी टाका सोबत टोमॅटो, मिरची व कांदा घाला. तव्यात राईचे तेल टाका व हे मिश्रण तव्यावर पसरवा एक बाजू चांगली शिजली की बाजू पलटून घ्या. दह्याच्या चटणीत काळी मीरीची थोडी पावडर टाका. तुमचा नष्ट तयार झाला. या नाश्त्याने तुम्हाला चांगली ऊर्जा आणि उत्साह मिळेल.

यात जास्त फॅट्स नाहीत म्हणून वजन देखील संतुलित राहिल. या नाश्त्याच्या तासा भराने एक संत्रे नक्की खा. संत्र्यात फायबर असते व याने तुमचे अन्न योग्यरित्या पचन होईल. दुपारच्या जेवणात तुम्हाला ग्रेवी असणारी भाजी, थोडासा भात आणि शेवटी एक ग्लास ताक प्यायचे आहे. दिवसभर काम करण्यास पोटात अन्न असणे फार गरजेचे आहे. म्हणून दुपारचे जेवण थोडे हलके व थोडे जड घ्यावे. उन्हाळ्यात ताक पीणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.

ताक शरीराला थंडावा प्रदान करते म्हणून याचे सेवन नक्की करा. संध्याकाळी तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर आता तुम्ही हेल्दी चहा पिण्यास सुरवात करा. पाण्यात आले, मध आणि लिंबू टाकून मंद वाफेवर गरम करुन घ्या जर व याचे सेवन करा. नियमित हा पेयाचे सेवन तुम्ही करत असाल तर सर्दी व खोकला तुमच्या समीप देखील येणार नाहीत. रात्रीच्या जेवणात आपल्याला चपाती व भाजी हे दोनच घटक घ्यायचे आहेत.

हे वाचा:   उन्हाळ्यात एकदाही आजारी पडायचं नसेल तर हे प्याच.! शरीरातली सर्व गरमी निघून जाईल.! उन्हाळ्यात असे दूध एकदा तरी प्यावे.!

जेवण हे झोपण्याच्या आधी चार ते पाच आधी होणे गरजेचे आहे याने तुम्ही खाल्लेले अन्न नीट पचन होईल. जेवणानंतर तासा भराने एक छोटा तुकडा गूळाचा देखील खावा. नंतर शत पावली करायला विसरु नये. याने तुमच्या शरीराची हालचाल होईल व खाल्लेले अन्न पचन तर होईल मात्र चरबी देखील तयार होणार नाही. झोपण्या आधी एक ग्लास दूध वेलची घालून प्या आणि मग एक तासाने तुम्ही निद्रा घ्या.

हा आहार नियमित तुम्ही घेत असाल तर तुमचे वजन नियंत्रणात राहिल व आरोग्य देखील चांगले राहिल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.