कितीही खा प्या, पण लिव्हर साफ नक्की करा.! लिव्हर ची स्वच्छता अशी केली जाते.! नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्या शरीराला नियमित काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उर्जेची आवश्यकता असते. ही उर्जा आपल्याला आपण रोज जे अन्न पदार्थ ग्रहण करतो त्यातून मिळत असते. परंतू आज काल माणसे घरातील असंतुलीत व ताजा आहार सोडून बाहेरचे रस्त्यावर मिळणारे अरबट सरबट व तिखट तेलकट पदार्थ जास्त खातात. आपल्या कामातून खाण्यासाठी सवड मिळत नसल्याने फास्ट फूड व जंक फूड खाण्याचे प्रमाण देखील आता वाढत चालले आहे.

हे पदार्थ चवीला रुचकर व स्वादीष्ट असतात परंतू यांचा आपल्या शरीराला काडी मात्र ही फायदा होत नाही. या पदार्थांमुळे पचनक्रियेत बाधा निर्माण होवू लागते. सतत पोटात दुखणे, शौ’चास नीट न होणे, उलटी सारखे वाटणे अश्या अनेक समस्या आपल्याला शरीरात होताना दिसू लागतात. सोबतच जास्त म’ध्यपान केल्याने देखील यकृताला व किडनीला इजा होण्याची शक्यता असते.

पचन क्रियेच्या व पोटाच्या विकारांवर आता बाजारात अनेक गोळ्या व औषधे उपलब्ध आहेत. परंतू या कृत्रीम गोळ्या व औषधे खाऊन आपण आपल्याच शरीराला अपाय करुन घेत आहात. रोज या गोळ्यांच्या वापराने शरीराला इजा तर होतेच मात्र महिन्याला पैसे देखील मोठ्या प्रमाणात खर्च होवू लागतात. परंतू आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास घ्या.

कारण आज आमच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी पोटाच्या समस्यांचे निवारण करणारा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. हा उपाय अगदी साधा सोपा घरगुती उपाय आहे त्यामूळे हा तुम्ही तुमच्या घरच्या घरीच तयार करु शकता. या उपायाची नोंद ग्रंथ आयुर्वेदात देखील केली गेलेली आहे. म्हणूनच हा उपाय तुमच्या शरीरासाठी अत्यंत निर्धोक आहे. तुम्ही हा उपाय अगदी निर्धास्त पणे करु शकता.

हे वाचा:   सिताफळ आवडीने खाणाऱ्यांनी एकदा नक्की बघा.! पावसाळ्यात सिताफळ खाणे चांगले असते का.? आरोग्यासाठी सिताफळ नेमके कसे.?

हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही म्हणूनच अगदी सामान्य लोकांच्या खिशाला देखील परवडेल. चला वेळ न दवडता पाहूया हा चमत्कारिक उपाय. फळे खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते असे आपल्याला अगदी लहानपणापासूनच सांगितले जाते. फळांमध्ये विविध प्रकारची जीवसत्वे व शरीर उपयुक्त घटक असतात. जे आपल्या शरिरातील उर्जेला भरुन काढतात.

तुम्ही डॉकरांकडे गेलात की तुम्हाला ते फळे खा असा सल्ला नेहमीच देतात. हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यक आहे सफरचंद. सफरचंद खाणे अत्यंत गुणकारी मानले जाते. याच बहुगुणी सफरचंदाला आधी चांगले धुवून घ्या व पुढे याची छान बारीक फोडी करुन घ्या. दुसरा घटक जो आपल्याला या उपाया करिता हवा आहे तो आहे डाळिंबाचा रस. डाळिंबाच्या सेवनाने शरीरात रक्ताची कमी कधीच होत नाही.

सोबतच वजन देखील आटोक्यात राहते. या उपायासाठी एक ताज्या डाळिंबाचा रस काढून घ्या. या उपायातील तीसरा घटक आहे आले. सर्दी असो किंवा खोकला सोबतच डोकेदुखी व घश्याचे आजार यावर आले एक रामबाण उपाय आहे. शरीराची रोगाशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील याच्या सेवनाने वाढू लागते. पित्त व अपचनासाठी आले गुणकारी मानले जाते. याच आल्याला बारीक चिरुन या उपायासाठी घ्या.

हे वाचा:   दातातले किडे झटपट बाहेर काढा.! दात दुखी मिटेल कायमची.! हा देशी उपाय तुम्हाला सर्व दाताच्या समस्येतून मुक्त करेल.!

आता या तीन्ही घटकांना मिक्सर मध्ये बारीक करुन एकत्र करुन छान याचे मिश्रण करुन घ्या. पुढे यात दोन चमचे मध घाला. आता हे जे मिश्रण तुम्ही तयार केले आहे त्याचे सेवन रात्री झोपण्याच्या आधी रोज नऊ दिवस न चुकता करा. याच्या प्रभावाने तुम्हाला असणारे सर्व पोटाचे व पचनाचे दोष निघून जातील. यकृताचे आरोग्या चांगले होईल. जे अन्न खाल ते योग्य वेळी अंगाला लागू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.