शरीर सफाई करण्याची सर्वात सोपी पद्धत.! ज्यांनी ज्यांनी केला आहे हा उपाय त्याचे आरोग्याचे झाले आहे कल्याण.! नक्की करून बघा.!

आरोग्य

मित्रांनो आपल्याला काम करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते. ही उर्जा आपल्याला आपण जे अन्न रोज खातो त्यातून मिळते. मात्र खाल्लेले अन्न नीट पचले नाही तर आपल्या शरीराला या अन्नाचा काही फायदा होत नाही. नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौ’चास होत नाही.

या त्रासाला ब’द्धकोष्ठता किंवा म’लावष्टंभ असेही म्हटले जाते. या सोबतच ब’द्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौ’चास घट्ट होणे, शौ’चावेळी जास्त जोर द्यावा लागणे असे त्रास होत असतात. शौ’चाचा खडा धरत असल्याने मल बाहेर येताना गुदाच्या ठिकाणी जास्त ताण व त्रास होत असतो. त्यामुळे गुदाच्या ठिकाणी जखमा होणे, मू’ळव्याध होणे असे त्रासही नियमित पोट साफ होत नसल्यास होऊ शकतात.

रोजच्या रोज व्यवस्थित पोट साफ न झाल्यास‎ शौ’चास होताना त्रास होणे, कधी कधी सं’डासचा खडा तयार होऊन शौ’चास जोर द्यावा लागणे, यामुळे मूळव्याध होणे, ‎पोट गच्च होणे, ढेकर येणे, पोटात गॅस होणे, तोंडाचा उग्र वास येणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, भूक मंदावणे, रक्तदाब वाढणे अशा अनेक तक्रारी नियमित पोट साफ न झाल्यास होत असतात. रोज बाहेरचे अरबट सरबट खाणे व संतुलीत आहार न घेणे हे ब’द्धकोष्ठता होण्याचे प्रमुख कारण आहे.

हे वाचा:   या चुका केल्या तर मुळव्याध शंभर टक्के होणार.! आयुष्यात सगळं काही करा परंतु या चुका खरोखर टाळा.!

अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, पचनास जड असणारे पदार्थ, मांसाहार असा आहार खात असल्यामुळे पोट साफ न होण्याची तक्रार सुरू होते. कारण अशा पदार्थात फायबर्सचे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे ब’द्धकोष्ठता होत असते.याशिवाय पोटाचा व आतड्यांचा व्यायाम न झाल्यानेही ब’द्धकोष्ठता होत असते. आज काल पोट साफ होत नाही म्हणून त्यासाठी गोळ्या किंवा औषधे वारंवार घेणे देखील टाळले पाहिजे.

कारण या औषधांमुळे आतड्याच्या नैसर्गिक कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊन ब’द्धकोष्ठता अधिक बळावते.औषधांची सवय झाल्याने औषधे घेतल्याशिवाय आतडे आपली नैसर्गिक कार्ये पार पाडत नाहीत. या साठीच आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्या या समस्येवर एक एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. हा उपाय साधा सोपा नैसर्गिक उपाय आहे मात्र याचे कमालीचे फायदे आपल्या शरीराला होतात.

हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम दोन ताजी पिकलेली लिंबे घ्यायची आहेत. आता ही लिंबे दोन तासासाठी थंड पाण्यात ठेवून द्या. लिंबू आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यात असणारे जीवनसत्व क शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढवत व पित्त अपचन सारख्या समस्यांना देखील आळा घालते. दुसरा घटक जो आपल्याला लागेल तो म्हणजे लसणीच्या पाकळ्या. लसूण एक शक्ती वर्धक घटक आहे.

हे वाचा:   सात दिवसात सात किलो वजनाचे टार्गेट मोडले.! झटपट वजन कमी होऊ लागले.! एका लिंबाने जादू केली.!

त्याच बरोबर सर्दी व खोकल्यासाठी सोबतच घश्याच्या विकारांवर हा एक रामबाण उपाय आहे. पोटातीच्या समस्या देखील लसूण दूर करते. तीसरा व शेवटचा घटक जो आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे एक चमचा चार ते पाच चमचे मध. मध हा अत्यंत नैसर्गिक घटक आहे. याच्या सेवनाने आपल्या शरीराला अनेक प्रकारची मिनरल्स व विटामीन प्राप्त होतात. आता एका भांड्यात लिंब अगदी बारीक कापून घ्या. पुढे यात सात ते आठ पाकळ्या लसूणच्या पाकळ्या बारीक करुन टाका व मध चार चमचे टाका.

हे मिश्रण एका बरणीत मिक्स करुन घ्या. रोज सकाळी उठल्यावर याचे सेवन करा तुम्हाला असणार्या पोटाच्या सर्व समस्या या उपायाने अगदी समूळ नष्ट होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.