वेळीच बदला आपल्या या सवयी अन्यथा व्हाल कायमचे दरिद्री.!

अध्यात्म

प्रत्येक व्यक्तीला काही चांगल्या व काही वाईट सवयी असतात. चांगल्या सवयींचे लोक अनुकरण करतात तर वाईट सवयींबद्दल लोक पाठीमागे चेष्टा-मस्करी करतात. मात्र व्यक्तींमध्ये अशा काही सवयी अशा असतात, ज्यामुळे व्यक्तीच्या घर परिवार व कुटुंबामध्ये दरिद्रता येते. मात्र त्या सवयीबद्दल व्यक्तीला ज्ञान देखील नसते की आपण ज्या सवयी आपल्या अंगी बाणवल्या आहेत त्या सवयींमुळे आपल्या कुटुंबावर व आपल्यावर गरिबीचे संकट देखील येऊ शकते!

गरिबी व दरिद्रता येणे ही खूप मोठी प्रोसेस आहे, जी आपल्याला लवकर समजत नाही. आपले चिंतन, मनन, बुद्धीची क्षमता आणि त्यासोबतच जीवनामध्ये काम करण्याची शैली, काम करताना येणारे अडथळे यासारख्या गोष्टी जीवनामध्ये अंतर्भूत असतात. बऱ्याचदा या सर्व गोष्टींची सांगड आपल्याला घालता येत नाही व आपले जीवन अतिशय अडचणीत सापडत.

आज आम्ही आपल्याला या चार सवयींबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यामुळे आपण आपल्या घरामध्ये दारिद्र्य घेऊन येतो. दरिद्रता म्हणजे निगेटिव्हिटी नकारात्मकता जी आपण कळत नकळत आपल्यामध्ये वाढवत असतो.

घरातील भंगार सामान – जर आपल्या घरात देखील निरुपयोगी व तुटलेले मोडलेले वस्तूंचे भंगार सामान घरात साचलेले आहे, तर या वस्तूंना वेळी घराबाहेर काढावे. या भंगार सामानाला सांभाळून ठेवल्यामुळे घरामध्ये दरिद्रता येते. म्हणून वेळीच घरातली भंगार वस्तू  उचलुन बाहेर टाकून द्याव्यात किंवा भंगारवाल्याला विकून टाकाव्या.

हे वाचा:   या अशा प्रकारच्या चुका घडल्या तर याला मानले जाते अपशकुन; तुमच्या हातून तर अशा वस्तू पडत नाहीयत ना.?

सूर्योदयानंतर झोपेतून उठणे – सूर्योदयापूर्वी झोपेतून उठल्यामुळे आपल्यासोबत सकारात्मकता देखील जागी होते व आपल्या सोबत आपल्या संपूर्ण घराचे वातावरण देखील सकारात्मक होते. या विपरीत सूर्योदयानंतर उठल्यानंतर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते व ज्यामुळे आपल्यात आळस भरतो व घरामध्ये दरिद्रता येते. घरात दारिद्र्य येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सकाळी उशिरा उठणे हे सुद्धा असते!

व्य-सन करणे-  जर आपल्याला एखाद्या न-शेची सवय झाली असेल किंवा आपण व्यस-नाधीन झाला असाल तर योग्य वेळी ही सवय बदलून टाका व न-शा करण्याचे सोडून द्या. असे न केल्यास आपल्या घरामध्ये लवकरच गरिबी वाढेल दारिद्र्याचा सामना आपल्याला करावा लागेल. आपण कितीही पैसे कमवले तरीही व्यसन आपल्याला एक ना एक दिवस दरिद्र्याच्या वाटेने घेऊन जातेच. दरिद्रता आणणार्‍या चार वाईट सवयी म्हणजे घरामध्ये भंगार ठेवणे, सूर्योदयाच्या नंतर उठणे, नशा -व्य-सन करणे, तसेच स-ट्टाबाजी व जु-गार खेळणे !

हे वाचा:   घरात ठेवा या पाच वस्तू, स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितले घरामध्ये सुख संपन्नता येण्यासाठीचे हे रहस्य.!

जु-गार -स-ट्टा लावणे – यामुळेदेखील धनाची हानी होते व आपल्या घरामध्ये दरिद्रता घेऊन येते. देवी महालक्ष्मी मातेला स-ट्टेबाजी व जु-गारी लोकांचा राग असतो, त्यामुळे लक्ष्मी माता कधीही अशा लोकांच्या जवळ राहत नाही व त्या घरातून कायमची निघून जाते.

तर या होत्या व्यक्तींच्या चार वाईट सवयी ज्यामुळे व्यक्ती स्वतःहून दरिद्रता आपल्या घरात घेऊन येत असतो! जर आपल्याला देखील अशा सवयी असतील तर वेळीच आपल्या स्वभाव बदला व या सवयींचा त्याग करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *