सात दिवसात सात किलो वजन कमी झालं असे.! मेणासारखं वजन पघळत जाते.! जाड माणूस होईल एकदम पातळ.!

आरोग्य

हल्ली प्रत्येकाला वजनाच्या समस्या त्रास देतात
वजन खूप वाढते. वाढलेले वजन आपले जीवन नकोसे करते आणि शरीरावर अतिरिक्त चरबी दिवसेंदिवस वाढत जाते. ही अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण करतात. व्यायाम करतात, योगासने करतात परंतु इतके सारे प्रयत्न करून देखील शरीरामध्ये आवश्यक ते काही बदल दिसून येत नाही. आपल्यापैकी अनेक जण जेवणावर नियंत्रण देखील ठेवतात आणि बहुतेक वेळा वेळेवर जेवण न केल्यामुळे आपल्यापैकी अनेकांना अशक्तपणा थकवा जाणवतो.

जर तुम्ही सुद्धा अशी चूक करत असाल तर असे अजिबात करू नका. आपले शरीर सदृढ राहण्यासाठी वेळेवर जेवण गरजेचं आहे. जर तुम्ही खूप कमी जेवत असाल तर तुमच्या शरीराला अन्नपदार्थांचे कमतरता भासू लागेल आणि शरीरातील कार्य व्यवस्थित रित्या पार पडणार नाही म्हणून आपल्याला दिवसभरातून थोडे थोडे पदार्थ अवश्य सेवन करायला पाहिजे. हे पदार्थ सेवन करत असताना काळजी देखील घ्यायला पाहिजे.

आपण कोणकोणत्या प्रकारचे अन्नपदार्थ सेवन करतो आहे हे एकदा तपासायला हवे. आपल्यापैकी अनेक जण तिखट, तेलकट, मैद्याचे पदार्थ सेवन करतात यासारख्या पदार्थांमुळे आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण होते. बहुतेक वेळा आपल्या शरीराची पचन संस्था धीम्या पद्धतीने कार्य करते. मेटाबोलिझम रेट कमी होतो आणि या सर्वांमुळे देखील आपले वजन वाढते. जर तुमचे देखील वजन वाढलेले आहे. तुम्ही सुद्धा वजन नियंत्रणात करू इच्छित असाल तर आजच्या या लेखांमध्ये सांगितलेले उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहेत.

आजच्या लेखांमध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही केला तर सात दिवसांमध्ये सात किलो पेक्षा जास्त तुमचे वजन कमी होणार आहे आणि तुमच्या शरीराचा आकार पुरवत होण्यासाठी मदत होणार आहे. आपले शरीर सात दिवसांमध्ये निरोगी बनवण्यासाठी व शरीराचा वाढलेला घेर कमी करण्यासाठी आपल्याला अमळशीच्या बिया लागणार आहे. अमळशीच्या बिया या आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानले गेलेले आहे. या बियांच्या अंगी ओमेगा फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते.

हे वाचा:   उन्हाळ्यात गरम पाणी पीत असाल तर एकदा नक्की वाचा.! असे करणे बरोबर की चुकीचे.! बघा काय आहे समोर.!

या ऍसिड मुळे आपल्या शरीरातील पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागते त्याचबरोबर आपल्या शरीरातील मेटा बोलिझम रेट वाढतो. या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात आणि म्हणूनच आपल्याला या बियांचा वापर आजचा उपाय करण्यासाठी वापरायचा आहे. आपल्यापैकी अनेक जण या बिया कच्चा खातात परंतु असे करणे अत्यंत चुकीचे आहे. जर आपण या बिया कच्च्या खाल्ल्या तर आपल्याला पोटाचे आजार होऊ शकतात.

म्हणजेच जुलाब देखील होऊ शकतात म्हणूनच शक्यतो या बिया आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. या बिया व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या बियांना जास्त काळे होईपर्यंत भाजायचे नाही अन्यथा याची चव कडवट लागेल. आता आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ओवा. ओव्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात.

तुमच्या पोटामध्ये जमा झालेला गॅस, ऍसिडिटी, पित्त यासारख्या समस्या देखील ओवा दूर करतो. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहे मेथी. मेथी ही जरी चवीने कडू असली तरी याच्या अंगी अनेक औषधी गुणधर्म असतात. मेथी मध्ये अँटिऑक्सिडंट व आपल्या शरीरातील पचन संस्था जास्त वेगाने काम करण्याची क्षमता असते तसेच यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे तुमचे पोट नेहमी भरलेले राहते, परिणामी तुम्हाला जास्त प्रमाणात भूक लागत नाही.

हे वाचा:   आयुर्वेदामध्ये अमृत मानला जातो हा वेल, औषधी गुणधर्म एवढे की एकही आजार तुम्हाला टच देखील करणार नाही.!

आता आपल्याला सैंधव मीठ म्हणजेच काळे मीठ लागणार आहे. हे मीठ आपण चवीसाठी वापरणार आहोत. हे मीठ जर आपण नियमितपणे सेवन केले तर तुमच्या पोटा संदर्भातील कोणतेही आजार तुम्हाला झाले असतील तर ते दूर होतील उदाहरणार्थ पोटामध्ये गॅस झालेला असेल,पोटामध्ये पित्त झालेले असेल तर यामुळे देखील ते दूर होईल म्हणूनच प्रत्येकाने सैंधव म्हणजेच काळे मीठ सेवन करायला हवे.

आता आपल्याला हे तिन्ही पदार्थ एकत्र करायचे आहेत आणि मिक्सरच्या साह्याने यांची पावडर बनवायची आहे. ही पावडर बनवून झाल्यानंतर आपल्याला गॅसवर एक पातेले ठेवायचे आहे त्यामध्ये एक ते दोन ग्लासभर पाणी ओतायचे आहे. तुम्ही पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार देखील घेऊ शकतात त्यानंतर दोन चमचा आपल्याला बनवलेली पावडर मिक्स करायची आहे. हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला उकळू द्यायचे आहे.

मिश्रणाचा रंग बदलल्यावर गॅस बंद करायचा आहे. हे मिश्रण थोडेसे कोमट झाल्यावर आपल्याला गाळणीच्या मदतीने गाळायचे आहे आणि सकाळी उपाशीपोटी सेवन करायचे आहे. आपण फक्त सात दिवस हा उपाय सातत्याने केला तर तुम्हाला त्वरित फरक झालेला दिसून येईल. तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी मिळण्यासारखी वितळलेली असेल व त्याचबरोबर तुमच्या पोटाचा वाढलेला घेर कमरेचा आकार पूर्वत होऊ लागेल म्हणून हा उपाय अवश्य करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.