सुटलेले पोट किती दिवस घेऊन मिरवणार.? सुटलेल्या पोटाला एका महिन्यात ठिकाणी लावेल हा बिगरखर्ची घरगुती उपाय.!

आरोग्य

असंतुलित आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर सुंदर सुडोल व आकर्षक असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र बाहरे मिळणारे तेलकट फास्टफूड नियमित खाल्याने तुमच्या शरीरावर गरजे पेक्षा जास्त चरबी उत्पादित होते. आज कालची समान्य समस्या बघायची झाली तर ती म्हणजे वाढलेले पोट. पोट वाढले की आपल्या शरीराची इतर काम करण्याची गति मंदावते व आपण स्लो होतो.

आपल्याला मेहनतीचे काम करणे खूप कठीण वाटू लागते व थोडे काम केल्यास आपल्याला थकवा जाणवू लागतो व दम लागतो. मात्र आता तुमचे वाढलेले पोट काही दिवसांमध्येच गायब होईल. आज आम्ही आमच्या या लेखाद्वारे तुम्हाला याच वाढलेल्या पोटाच्या समस्येतून बाहेर पडण्याचा एक सोपा व आयुर्वेदीक उपाय सांगणार आहोत. हा तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पर्याय ठरेल म्हणूनच आमचा हा लेख अगदी शेवट पर्यंत वाचा.

पोट वाढण्याची अनेक कारणे आहेत. असंतुलित आहार तसेच बाहेरचे अरबट सरबट खाल्याने देखील पोट वाढते. मात्र स्निग्ध पदार्थ म्हणजेच दही, दूध, चिकन तसेच तेल जास्त प्रमाणात ग्रहण केल्याने आपल्या पोटाची चरबी वाढते. मात्र हे घटक देखील आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहेत. हे प्रमाणात ग्रहण करुन व्यायाम करणे देखील आवश्यक असते. आठवड्यातून किमान चार दिवस तरी व्यायाम करणे जरुरी आहे.

हे वाचा:   मासे न खाणारे लोक.! आजच सावध व्हा.! आयुष्यातले पाच वर्ष होतील कमी.!

याने तुमची पचनसंस्था सुरळीत होईल व जरी तुम्ही जड पदार्थ खाल्ले तरी ही शरीर संतुलित राहिल. वाढलेले पोट कमी करण्यासाठी आपल्याला सर्व प्रथम आवश्यकता पडेल ती म्हणजे एका सफरचंदाच्या फळाची. सफरचंदामध्ये अनेक पौष्टिक घटक व जीवनसत्वे आहेत. डॉक्टर सुद्धा इस्पितळात गेल्यावर सफरचंद खा असा सल्ला देतातच. सफरचंदाच्या ग्रहणाने आपल्या शरीरातील सर्व थकवा व अशक्तपणा दूर निघून जातो.

आपल्या या सफरचंदाला पुर्ण अन्न देखील म्हटले जाते याचे कारण म्हणजे यात सर्व जेवणात असणारी जीवनसत्वे व घटक असतात.आपल्या शरीरात असणारे वाईट जंतू मारण्याचे काम सफरचंद करते म्हणून आपल्या उपयासाठी या सफरचंदाचा समावेश जरूरी आहे. दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लसूण होय लसणीचे या उपयात महत्वाचे काम आहे.

लसणीला या आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान दिले गेले आहे. सर्दी असो या खोकला, अंग दुखी अथवा ताप लसूण या सगळ्यांवर रामबाण उपाय आहे.लसूण अत्यंत गरम आहे आणि याचे ग्रहण करताच तुमच्या पोटातील चरबी कमी होण्यासाठी मदत होईल. म्हणूनच लसूण आवश्यक आहे. या नंतर या मिश्रणात चार चमचे आल्याचे चूर्ण टाकायचे आहे. आले कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात करते. कच्चे आले हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

हे वाचा:   या पाण्याची कमाल तुम्ही एकदा नक्की बघा.! ज्या पण झाडाच्या मुळाशी टाकाल ते झाड दुपटीने वाढते.! न रोपणारे झाड रोपणार.!

आल्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी देखील करता येते. कोलेस्ट्रॉलच्या समस्येचा सामना करणाऱ्यांसाठी कच्चे आले फायदेशीर ठरते. त्याच बरोबर रक्तदाब नियंत्रित आले ठेवण्यास मदत करते. सफरचंदाचे तुकडे, लसणीच्या चार पाकळ्या व आल्याचे चूर्ण एकत्रित करा. सफरचंदातील बिया चाकूच्या मदतीने बाजूला करुन घ्या आणि या सर्व पदार्थांना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

वाटून झाल्यानंतर या मध्ये एक पेला पाणी घाला व परत वाटून घ्या. या मिश्रणाला रात्री जेवण्यापूर्वी रोज आठ दिवस घ्या. हा उपाय करताच काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवू लागेल. तुमचे पुढे आलेले पोट हळू हळू कमी होवू लागेल. हे सर्व पदार्थ तुमचे अन्न नीट पचन होते व शरीरावर जास्त चरबी बनून राहत नाही व वजन संतुलित राहते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.