या पाण्याची कमाल तुम्ही एकदा नक्की बघा.! ज्या पण झाडाच्या मुळाशी टाकाल ते झाड दुपटीने वाढते.! न रोपणारे झाड रोपणार.!

आरोग्य

वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातील प्राणवायू म्हणजेच ज्याला आपण सामान्य भाषेत आॅक्सीजन म्हणतो तोच खूप प्रमाणात कमी होवू लागला आहे. मानसांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे व या लोकसंख्ये सोबत मानव जीवनासाठी लागणार्या गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. राहण्यासाठी घर हवे म्हणून जंगलतोड तसेच वृक्ष जमीनध्वस्त केले जावू लागले आहेत.

दळणवळणा साठी पक्का रोड व वाहने देखील वाढू लागली आहेत याने वातावरणात कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी श्वास घेणे देखील कठीण होवून बसले आहे. अन्न पुरवठा व्हावा म्हणून बाजारात मिळणारे प्रत्येक पदार्थ व घटक हे केमिकल रसायने वापरुन तयार केले जातात. बोलण्याचा उद्देश म्हणजे पृथ्वीवर सध्याच्या काळात प्रदुषणाचे राज्य आहे.

एवढे असून ही आज आपण जीवंत आहोत याचे एकच कारण आहे ते म्हणजे उरलेली काही झाडे. वर्षभरात एक झाड बावीस ते तेवीस किलो कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेते. एक झाड वर्षात शंभर किलोपर्यंत ऑक्सिजन देते.सोबतच झाडाचा प्रत्येक भाग हा महत्वाचा असतो मानव उपयोगी असतो. फळे-फुले, सावली, अन्न तसेच निवारा देखील झाडांची देण आहे.

मात्र परंतु मानवाने मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी याच झाडांना हानी पोहचवण्यास सुरुवात केली आहे. जंगलतोड करून तो इमारती उभ्या करू लागला आहे आणि त्यामुळे निसर्गाला हानी पोहचत आहे आणि मानवाच्याच जीवनाला धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय एकच आहे तो म्हणजे, आपण झाडांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून कृतज्ञतेने जास्तीत जास्त वृक्षारोपण केले पाहिजे.

हे वाचा:   फक्त पाच मिनिटाचा हा उपाय करून बघा; एखाद्या अभिनेत्री प्रमाणे ओठ दिसू लागतील, जाणून घ्या ओठाची सुंदरता वाढवण्याचा भन्नाट उपाय.!

तुमच्या घरातील झाडे जर वाढत नसतील तर आमच्या या लेखात तुमच्यासाठी एक छोटासा व साधा उपाय आहे. या साठी तुम्हाला कोणत्या ही मोठ्या भांडवलाची गरज भासणार नाही. चला तर वेळ न घालवता पाहूया हा उपाय. आपल्या घरात छोटी-छोटी झुडूपे असतात. ही झुडूपे आपल्या घरात ऑक्सीजन प्राणवायू देण्याचे काम करते. माणसांप्रमाणे झाडांना देखील आजार होतात.

होय तुम्ही कित्येक वेळा पाहिले असेल झाडांची पाने पिवळी पडतात कोमेजू लागतात त्याच बरोबर झाडांना फळे अथवा फुले येणे बंद होते. तसेच वाढ होणे बंद होते. या सर्व बाधांचे कारण म्हणजे पोषक तत्वांची कमी मात्र तुम्ही झाडांना योग्य पोषक देवू शकता. झाडांना फक्त पाण्याची गरज नसते तर त्यांना सुद्धा वाढीसाठी खताची आवश्यकता असते. तुम्ही तुमच्या घरातील भाज्यांची तरफळे व आवरणे झाडांच्या मुळात घालू शकता.

ही फळांची टरफले व भाज्यांची आवरणे एक चांगले जैवीक खत मानले जाते. ही आवरणे मातीला सुपीक बनवतात. याने माती मुळांना मजबूती देते. झाडाची मुळे मातीत चांगली रुजलेली असली तर झाडाचे आरोग्य देखील चांगले राहते. झाड सदा बहरलेले दिसते. या सोबतच चण्याचे पाणी म्हणजेच चण्याची भाजी बनवताना जे पाणी उरते ते आपण झाडांना घालवे. या पाण्यात अनेक जीवनसत्व व पौष्टिक घटक असतात.

हे वाचा:   एकाच जागेवर का येतात पिंपल्स.! त्यामागचे लॉजिक जो समजून घेतो तो पिंपल्स येण्यापासून वाचतो.! आयुष्यभर पिंपल्स पासून दूर राहायचे असेल तर हे काम करावे लागेल.!

चण्यामध्ये कॅल्शियम तसेच फोस्फेट असते सोबत आयरन व जिंक देखील मोठ्या प्रमाणात आढळून येते. हे सर्व घटक वाढ आणि मजबूती दोन्ही प्रदान करण्यासाठी प्रचंड उपयुक्त आहेत. चणे खाल्ल्याने आपली तब्येत पण सुधरते याच चण्याच्या पाण्यामुळे आपली झाडे देखील टवटवीत होतील. परत फुले येवून फुल झाडे बहरू लागतील. बाजरातील केमिकल रसायनाने बनलेली खाते ही झाडांना थोड्या काळासाठी तजेदार करतात मात्र काही वर्षानंतर झाडे कोमेजू लागतात.

चला तर अश्या खतांपेक्षा घरातच तयार होणारे जैवीक खात वापरुन झाडांना तसेच झुडूपांना पुनर्जीवीत करुया. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.