या वनस्पतीचा चहा बनवून पिल्यास सर्व आजार कायमचेच दूर जातात.! आयुष्यात एकदा तरी ट्राय करावी ही चहा.!

आरोग्य

आपल्याला जीवन व्यतीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा हवी असते. शरीर निरोगी ठेवणे फार महत्त्वाचे आहे. आपण निरोगी असलो तर कोणते ही काम अगदी सहजरित्या करू शकतो. मात्र अनेक वेळा कमजोर रोग प्रतिकार शक्तीच्या प्रभावाने आपल्याला अनेक प्रकारचे आजार होतात सोबतच आपल्या आस पास वाढत असलेल्या प्रदूषण व त्याच्या प्रादुर्भाव यांच्या करणाने देखील आपण आजारी पडत असतो. अश्या वेळी आपण सर्वात आधी डॉक्टरांकडे धाव घेतो.

बाजारातील कृत्रिम व अनैसर्गिक गोळ्या व औषधे खावून आपल्याला थोड्या काळासाठी बरे वाटते मात्र पुढे या समस्या वारंवार होवू लागतात. या अनैसर्गिक गोळ्या आपल्या शरीराला इजा करू शकतात म्हणून यांचा अति वापर टाळावा. आज आम्ही आमच्या लेखात तुम्हाला असा एक रामबाण उपाय सांगणार आहोत जो अनेक समस्यांना आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकेल. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे त्यामुळे याचा आपल्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम दिसून येत नाही.

अगदी सर्व सामान्यांना लोकांना देखील हा उपाय परवडेल हा एक घरगुती उपाय आहे. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. आपल्या अवतीभवती अश्या अनेक भाज्या आहेत परंतु त्याचे फायदे आपल्याला माहिती नाहीत. निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला पोषक वातावरण, पोषक आहार आणि व्यायाम खूप गरजेचा असतो. वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचायचे असेल तर पोषक आहार घेतला पाहिजे.

हे वाचा:   लसणाचा केला जाऊ शकतो असाही उपयोग, कानामध्ये टाकून ठेवा काही वेळ सर्व ठणक दोन मिनिटात शांत होईल.!

थंडीच्या दिवसांमध्ये शेवग्याची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. तसेच या शेवग्याच्या शेंगा बऱ्याच वेळा सांबार मध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. शेवग्याची शेंगा तसेच शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात. शेवग्याच्या शेंगा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

शेवग्यामध्ये व्हिटॅमिस, लोह, कॅल्शियम,मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात आणि ही सर्व पोषक तत्वे आपल्या शरीराला उपयुक्त आणि फायदेशीर असतात.शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. शेवग्याच्या पाल्याचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.

नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.शेवग्याच्या पाल्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो.शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते. शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते. शेवग्याची पाने आणि नारळाच्या पाण्याचे मिश्रण करून पिल्यामुळे जुलाब आणि कावीळ यापासून सुटका होते.

ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात शेवग्याच्या शेंगेचा वापर करावा.शेवगयाची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ यांचा उपयोग औषधनिर्मिती केला जातो.पानांचा रस आणि मध मोतीबिंदू असलेल्या रोग्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो.शेवग्याचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

हे वाचा:   रात्री हा उपाय केला आणि सकाळी टाच दुखी गायब झाली.! या पाण्यात पाय सोडून बसा झटपट आराम मिळेल.!

हा उपाय तयार करण्यासाठी फक्त ही शेवग्याची पाने घ्या. यांना आधी शुद्ध पाण्यात धुवून टाका. नंतर एका पात्रात पाणी घ्या व गॅस वर गरम होण्यासाठी ठेवा. आता यात शेवग्याचा पाला टाका. चांगली उकडी आल्यास गॅस बंद करा. आता पुढे हे पाणी गाळून घ्या व पाला भाजीसाठी देखील वापरु शकता. या पाण्यात पुढे एक चमचा भर मध टाका. जेव्हा तुम्ही चहा घेता त्या वेळी या उपायाचा वापर तुम्हाला करायचा आहे.

या उपायाने तुमचे नैसर्गिकरित्या अनेक आजारांपासून रक्षण होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.